मुंबई – दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी महत्त्वाचे विधान केले आहे. शिवसेना आता सीमोल्लंघन करुन राष्ट्रीय राजकारणाच्या केंद्रस्थानी असेल असे राऊत म्हणाले आहेत.
संजय राऊत म्हणाले की, शिवसेना आता सीमोल्लंघन करुन राष्ट्रीय राजकारणाच्या केंद्रस्थानी असेल उद्धव ठाकरे काय बोलतील याकडे सर्वांचे लक्ष आहे. शस्त्र कधी, कुणासाठी काढायची असतात हे सायंकळी ठाकरेंच्या भाषणात कळेल.
शिवसेना राष्ट्रीय राजकारणात सक्रिय आहेच. सध्या 21 खासदार आहेत आमचे आता 22 होतील. भविष्यामध्ये 2024 नंतर शिवसेना राष्ट्रीय राजकीय राजकारणाच्या केंद्रस्थानी असेलल असे मोठे विधान त्यांनी केले आहे.
नोटाबंदीनंतर मोदींचे वक्तव्य होतं की, नोटाबंदीमुळे दहशतवाद्यांना मिळणारा पैसा बंद होईल. आज चार वर्षानंतरही सरसंघचालक त्यावर चिंता व्यक्त करत आहेत. म्हणजे चिंतेची बाब आहे.
सरसंघचालकांनी चिंता व्यक्त केलीय की ड्रग्जचा पैसा राष्ट्रविरोधी कारवायांसाठी वापरला जातो. या चिंतेशी आम्ही सहमत आहोत. सरकार भाजपचं आहे. मोदीचं आहे. ते जर रोखू शकत नाही तर कोण रोखणार? अस परखड सवाल यावेळी त्यांनी केला आहे.