अहमदनगर – साई बाबांचे दर्शनाहून परतताना भीषण अपघातात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाल्याची मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. नगर-मनमाड महामार्गावर एका बसने भाविकांच्या कारला जोरदार धडक दिली. या अपघातात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला. आज रविवार (दि. 15मे) दुपारच्या सुमारास राहुरी तालुक्यातील गुहा गावाजवळ हा अपघात झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातील एक कुटुंब साई बाबांचे दर्शनासाठी शिर्डी येथे आले होते. साईंचे दर्शन घेऊन हे कुटुंब शनि शिगणापूर येथे दर्शनासाठी चालले होते. यावेळी त्यांची कार राहुरी तालुक्यातील गावाजवळ पोहोचली असता एका बसने त्यांच्या कारला धडक दिली. अपघात इतका भीषण होता की, गाडीचा चक्काचूर झाला आहे. या मार्गावरील रस्त्याचे काम सुरु असल्याने एकेरी वाहतूक सुरु होती. समोरासमोर धडक झाल्याने भीषण अपघात घडला. अपघातात मृत्यू पावलेल्यांमध्ये एकाच कुटुंबातील दोन महिला, एक पुरुष आणि एका लहान मुलाचा समावेश आहे.