संगमनेर -यावर्षी सर्वत्र चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे ऊस हे शाश्वत पीक असल्याने शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त उसाची लागवड करावी, असे आवाहन कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ यांनी केले.
सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या बॉयलर अग्निप्रदीपन सोहळ्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कारखान्याचे माजी अध्यक्ष ऍड. माधवराव कानवडे होते. व्यासपीठावर बाजीराव पा. खेनमर, इंद्रजित थोरात, शिवाजीराव थोरात, उपाध्यक्ष संतोष हासे, लक्ष्मणराव कुटे, शंकरराव खेमनर, जि. प. सभापती मीराताई शेटे, सभापती सुनंदाताई जोर्वेकर, रामहरी कातोरे, अजय फटांगरे, नवनाथ अरगडे, साहेबराव गडाख, हौशिराम सोनवणे, सुभाष सांगळे, विशेष लेखापरीक्षक राजेंद्र देशमुख, सुरेश थोरात, शांताबाई खैरे, तहसीलदार अमोल निकम, पोलीस निरीक्षक सुनील पाटील, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर उपस्थित होते. यावेळी अनिल काळे व लता काळे, शेखर वाघ व मंदा वाघ, दादासाहेब कुटे व सोनाली कुटे, विनोद हासे व वैशाली हासे, डॉ.तुषार दिघे व सुरेखा दिघे यांच्या हस्ते बॉयलर अग्निप्रदीपन करण्यात आले.
ओहोळ म्हणाले, थोरात कारखाना ही तालुक्याची कामधेनू आहे. सहकाराबरोबर ग्रामीण विकास व आर्थिक चक्र तालुक्यात फिरत आहे. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली तालुका सर्व क्षेत्रांत अग्रस्थानी आहे. करोना संकटात तालुक्यातील नागरिकांना कारखान्याने भरीव मदत केली. अद्ययावत कोविड सेंटर सुरू केले. शेतकऱ्यांसाठी अनुदानाच्या अनेक योजना राबविल्या. यापुढेही विकासाची वाटचाल चालू राहिल, असे ते म्हणाले.
ऍड. कानवडे म्हणाले, आपला कारखाना नवीन आहे. कार्यक्षेत्रात उसाची जास्तीत जास्त लागवड झाली, तर लवकरच कारखाना कर्जमुक्त होवून शेतकऱ्यांना अधिक भाव मिळेल. कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनीही मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी संचालक चंद्रकांत कडलग, गणपतराव सांगळे, रोहिदास पवार, रमेश गुंजाळ, इंद्रजित खेमनर, अभिजित ढोले, भाऊसाहेब शिंदे, माणिक यादव, मंदा वाघ, आर. बी. रहाणे, सुरेश झावरे, शिवाजी जगताप, गौरव डोंगरे, किशोर टोकसे, तात्या कुटे, नानासाहेब दिघे, नानसाहेब शिंदे आदींसह सभासद, ऊस उत्पादक, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.