पुणे – सर्वोच्च न्यायालयाने काल अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याचा विद्यापीठ अनुदान आयोगाचा निर्णय योग्य ठरवल्याने परीक्षा रद्द करण्याची भूमिका घेणाऱ्या राज्य सरकारला चांगलाच दणका बसला. शिवसेनेची विद्यार्थी संघटना असलेल्या युवासेनेसह अन्य काही संघटनांनी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या परीक्षा घेण्याच्या निर्णयास सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते.
मात्र, सर्वोच्च न्यायालयाने परीक्षा घेण्याचा निर्णय योग्य ठरवल्याने विरोधकांनी आदित्य ठाकरे यांच्यावर चांगलाच निशाणा साधला.
भाजप नेते आशिष शेलार यांनी याबाबत ट्विट करताना, “एका “बबड्याच्या” हट्टापायी राज्यातील 10 लाख विद्यार्थ्यांना नाहक मानसिक त्रास दिला…त्यांच्या शैक्षणिक वर्षाचा खेळखंडोबा केला… आम्ही या निर्णयाचे धोके वारंवार सांगत होतो पण.. अहंकार…! ऐकतो कोण? मा. सर्वोच्च न्यायालयाने अखेर न्याय दिला!” अशी भूमिका मांडली. आपल्या ट्विटमध्ये शेलार यांनी आदित्य ठाकरेंचे नाव घेतलं नसलं तरी त्यांचा निशाणा आदित्य यांच्यावरच असल्याचं स्पष्ट आहे.
एका “बबड्याच्या” हट्टापायी राज्यातील 10 लाख विद्यार्थ्यांना नाहक मानसिक त्रास दिला…त्यांच्या शैक्षणिक वर्षाचा खेळखंडोबा केला…
आम्ही या निर्णयाचे धोके वारंवार सांगत होतो पण.. अहंकार…! ऐकतो कोण?
मा. सर्वोच्च न्यायालयाने अखेर न्याय दिला!
(2/3)— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) August 28, 2020
दरम्यान, शेलारांच्या या टीकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार आदित्य ठाकरेंच्या मदतीला धावून आले आहेत.
रोहित पवार यांनी शेलार यांच्या टीकेला प्रतिउत्तर देताना, “आमची परिक्षेबाबतची भूमिका तुमच्यासारखी राजकीय नाही तर विद्यार्थ्यांच्या काळजीपोटीच होती व राहील. पण @ShelarAshish जी बबड्याची सिरिअल पाहण्यात वेळ घालवण्याऐवजी विद्यार्थ्यांची अडचण समजून घेतली असती तर तुम्हालाही हे पटलं असतं.आता त्यासाठी किमान आपल्या tweet खालील रिप्लाय तरी वाचाल.” असं ट्विट केलं आहे.
आमची परिक्षेबाबतची भूमिका तुमच्यासारखी राजकीय नाही तर विद्यार्थ्यांच्या काळजीपोटीच होती व राहील. पण @ShelarAshish जी बबड्याची सिरिअल पाहण्यात वेळ घालवण्याऐवजी विद्यार्थ्यांची अडचण समजून घेतली असती तर तुम्हालाही हे पटलं असतं.आता त्यासाठी किमान आपल्या tweet खालील रिप्लाय तरी वाचाल. https://t.co/5rxIwyU2Rt
— Rohit Pawar (@RRPSpeaks) August 28, 2020