दिल्ली हिंसाचारावर शशी थरूर यांची खोचक टीका
नवी दिल्ली – दिल्लीत आज पुन्हा लागोपाठ दुसऱ्या दिवशी सीएए समर्थक आणि विरोधकांमध्ये जोरदार चकमक झाली. या हिंसाचारात आतापर्यंत हेड कॉन्स्टेबल रतनलाल यांच्यासह 7 जणांचा मृत्यू झाला आहे. याच पार्श्वभूमीवर कॉंग्रेसचे नेते शशी थरूर यांनी टीका केली आहे. त्यांनी एक ट्विट करत ये कहॉं आ गए हम असं म्हणत एक ट्वीट केलं आहे.
किस बात का जुर्माना है, ये कैसा शुल्क है?
यकीं नही होता, क्या ये मेरा मुल्क है?
ये कहाँ आ गए हम …. pic.twitter.com/L5fJZKlg53— Shashi Tharoor (@ShashiTharoor) February 24, 2020
शशी थरूर यांनी आपल्या ट्विटरवरून दिल्लीतील हिंसाचाराचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा कसला दंड आहे, हे कसले शुल्क आहे? हा माझा देश आहे, यावर विश्वास बसत नाहीये. कुठे आलो आहोत आपण अशा आशयाचं ट्वीट त्यांनी केलं आहे.
दरम्यान, घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पहाटेच्या सुमारास मौजपूर आणि आसपासच्या भागात आग लागल्याचे अग्निशमन दलाला 45 फोन आले, ज्यामध्ये एका अग्निशमन इंजिनवर दगडफेक करण्यात आली. त्यामुळे अग्निशमन इंजिनला आग लागली. यामध्ये तीन फायरमन जखमी झाले आहेत.