नवी दिल्ली – बांगलादेशच्या स्वातंत्र्य लढ्यातही मी सहभागी झालो होतो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वक्तव्य केले होते. यावरून काँग्रेस नेते शशी थरूर यांनी मोदींवर टीका केली होती. मात्र, टीका करताना चूक झाल्याचे लक्षात येताच थरूर यांनी थरूर यांनी पंतप्रधान मोदींची माफी मागितली.
बांगलादेशच्या स्वातंत्र्याच्या आंदोलनात मी सहभागी झालो होतो. माझ्या जीवनातील हे पहिलंच आंदोलन होते. त्यावेळी मी 20-22 वर्षाचा असेल. त्यावेळी माझ्यासह माझ्या अनेक सहकाऱ्यांनी बांगलादेशाच्या स्वातंत्र्यासाठी सत्याग्रह केला होता, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते.
यावर शशी थरूर म्हणले कि, आंतरराष्ट्रीय शिक्षण : आपले पंतप्रधान बांगलादेशला भारतीय फेक न्यूजचा आस्वाद देत आहेत. सगळ्यांनाच माहिती आहे की, बांगलादेशला कुणी स्वातंत्र मिळवून दिले, अशी टीका त्यांनी ट्विटरवरून मोदींवर केली.
परंतु, ही टीका करताना चूक झाल्याचे लक्षात येताच शशी थरूर यांनी मोदींची माफी मागितली. यावेळी ते म्हंटले कि, माझी चूक असेल तर ती मान्य करण्यात मला वाईट वाटत नाही. काल पटकन हेडलाईन आणि काही ट्विट वाचून मी ट्विट केले. सर्वांनाच माहिती आहे कि, बांगलादेशला स्वातंत्र्य कोणी मिळवून दिले. याच अर्थ होता की, नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या योगदानाबद्दल सांगितले नाही. परंतु, त्यांनी याचा उल्लेख केला होता. सॉरी, असे ट्विट शशी थरूर यांनी केले आहे.