Sharmila Thackeray । लोकसभेच्या पाचव्या टप्प्याचे मतदान येत्या २० तारखेला पार पडत आहे. या टप्प्यात महाराष्ट्र्राच्या मतदारसंघाचा समावेश आहे. या मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचारासाठी महायुतीची काल शिवाजी पार्कात सभा पार पडली. यावेळी पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकाच मंचावर उपस्थित होते. यावेळी राज ठाकरेंनी धडाकेबाज भाषण केले. त्यांच्या भाषणानंतर आज राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनीदेखील मविआवर मोजक्या शब्दात टीका केली.
बाळासाहेबांची इच्छा पूर्ण करा… Sharmila Thackeray ।
एका वृत्तवाहिनीशी बोलताना शर्मिला ठाकरे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्यावर अपत्यक्षपणे टीका केली. यावेळी शर्मिला ठाकरे यांनी, “मला वाटतं की, राज ठाकरेंनी खात्री बाळगली आहे की, मोदीच पंतप्रधान होणार आहेत. त्यामुळे त्यांनी आधीच महाराष्ट्राच्या मागण्या मोदींसमोर मांडल्या आहेत. मी सर्व मतदारांना एकच विनंती करीन की, बाळासाहेबांनी एकच इच्छा व्यक्त केली होती की, मला जर काँग्रेससोबत जायला लागलं तर, मी माझा पक्ष बंद करीन, त्यामुळे माझी सर्व मतदारांना विनंती आहे की, बाळासाहेबांची ती इच्छा पूर्ण करा. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे…. बाळासाहेबांची इच्छा पूर्ण करा… यातच आलं मला काय म्हणायचंय ते.”असे म्हणत त्यांनी ठाकरे गटावर निशाणा साधला
पुढे बोलताना त्यांनी,”मला असं वाटतं लोकांनी लोकांच्या भल्याचं राज्य आणावं. सभेतील भाषणात राज ठाकरेंनी कोणत्याही गोष्टींवर टीका न करता, लोकांच्या ज्या इच्छा आहेत, लोकांच्या ज्या मागण्या आहेत, समाजाच्या गरजा आहेत, त्यासंदर्भात मागण्या मांडल्या आहेत,”असं शर्मिला ठाकरे म्हणाल्या आहेत.
महायुतीच्या मंचावरुन राज ठाकरेंचं धडाकेबाज भाषण Sharmila Thackeray ।
शिवाजी पार्कमधील महायुतीच्या सभेत राज ठाकरे यांनी बेधडक भाषण केले. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक केले. त्याशिवाय त्यांनी केलेल्या कामाचा पाढा वाचला. राज ठाकरे यांनी मोदी पुन्हा सत्तेत येतील असा विश्वास व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानत राज ठाकरे यांनी ‘आपण आहात म्हणून राम मंदिर होऊ शकलं’, असे म्हटले. राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सहा बेधडक मागण्या केल्या आहेत. पुढच्या पाच वर्षांसाठी मोदीजींसमोर उभा आहे. महाराष्ट्राच्या खूप आपेक्षा आहेत. त्यातील काही गोष्टी सांगत आहे, असे राज ठाकरे म्हणाले.