नवी दिल्ली – विधानसभा निवडणुकीनंतर कुठलाही पक्ष सरकार स्थापन करू शकत नसल्यानं महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी, या राज्यपालांच्या शिफारशीनंतर आज राज्यात ‘राष्ट्रपती राजवट’ लागू झाली आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत या शिफारशीवर शिक्कामोर्तब केला होता. त्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या आदेशावर स्वाक्षरी केली आहे.
दरम्यान, राष्ट्रपती राजवट नंतर ही राज्यात सरकार बनवण्यासाठी राजकीय पक्षांमध्ये अजूनही चर्चा सुरू आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले आहे.
- सविस्तर चर्चेचेनंतर आम्ही निर्णय घेऊ -पटेल
- राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या निर्णयावर टीका -पटेल
- काँग्रेसला निमंत्रण न देता राष्ट्रपती राजवट लागू करणे चुकीचे आहे-पटेल
- राष्ट्रपती लगावत मनमानी कारभार -पटेल
- काँग्रेसला निमंत्रण का दिल नाही?- पटेल
- शिवसेनेने काल अधिकृत संपर्क साधला-शरद पवार
- राज्यपालांनी आम्हाला खूप सवड दिली-शरद पवार
- आधी आघाडीशी चर्चा करू नंतर शिवसेनेसोबत संपर्क करू
- सत्तास्थापनेसाठी आता आम्हाला घाई नाही – शरद पवार
- आता सेनेसोबत चर्चेची प्रक्रिया सुरु झालीय – शरद पवार
- उद्धव ठाकरेंचा फोन आला होता – पटेल
- सरकार बनवण्याबाबद आधी आघाडी बरोबर चर्चा – शरद पवार
- काल पहिल्यांदा सेनेनं अधिकृत फोन केला – पटेल