नागपूर – शिवसेनेच्या 40 आमदारांच्या बंडखोरीमुळे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यामुळे राज्यात सत्तेत असलेले महाविकास आघाडी सरकार कोसळले. त्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस यांच्या महाविकास आघाडी प्रयोगावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत होते. तसेच, राज्यातील आगामी महापालिका निवडणुकीतही तिन्ही पक्ष महाविकास आघाडी प्रयोगांतर्गत एकत्र येणार का, अशा चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, नागपूर येथे आयोजित पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाविकास आघाडी प्रयोगांतर्गत राज्यातील महापालिका निवडणुका लढवण्याबाबत संकेत दिले आहेत.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले, राज्यात होणाऱ्या महापालिका निवडणुका शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस यांनी एकत्रित लढवाव्यात. जर कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि सेना एकत्र लढले तर लोकांना त्यांच्या मनासारखे मतदान करता येईल, असं मला वाटतं पण बैठका घ्याव्या लागतील, असे शरद पवार म्हणाले.
पंतप्रधान मोदी उद्या बुंदेलखंड एक्स्प्रेस-वेचे उद्घाटन करणार
संसद भवन परिसरात निदर्शनं, आंदोलनं, उपोषणं करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या या निर्णायावर शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, सभागृहात मागणी मान्य झाली नाही तर लोग सभात्याग करतात, मग बाहेर महात्मा गांधींच्या पुतळ्यापाशी जाऊन शांतपणे निदर्शने करतात. केंद्र सरकारने शांतपणे आपले म्हणणे मांडण्याचा अधिकार काढून घेतला आहे, उद्या आम्ही बैठकीत ह्यावर चर्चा करू आणि हा प्रश्न कसा उचलायचा ते ठरवू, असे शरद पवार म्हणाले.
इंधन दर कपातीवरून भुजबळांचा राज्य सरकारला टोला; म्हणाले,”एखाद्याचे सगळे कपडे काढून घ्यायचे..”