मुंबई – देशभरासह राज्यातही करोनाग्रस्तांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे पंतप्रधानांना मदतीसाठी पत्र लिहितात. तसेच त्यांनी एखादं पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही लिहावे, अशी टीका माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. यावेळी ते बोलत होते.
देवेंद्र फडणवीस म्हणाले कि, शरद पवार हे पंतप्रधानांना मदतीसाठी पत्र लिहितात. त्यांनी एखादं पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही लिहावे. कशा प्रकारे त्यांनी गरीबांना मदत केली पाहिजे. तसेच दुकानदारांना, फुटपाथवर बसणाऱ्यांना, छोट्या उद्योगांना कशाप्रकारे मदत केली पाहिजे याविषयी त्यांनी राज्य सरकारला पत्र लिहावे.
⚫️स्थलांतरित मजुरांची प्रचंड हेळसांड, शेतमाल खरेदी न करण्यासह शेतकऱ्यांच्या विविध समस्या,गरिबांना रेशनधान्य न मिळणे, आरोग्यव्यवस्था पूर्णतः कोलमडली असणे, रुग्णसंख्या लपविणे, मृतदेहांबाबत प्रोटोकॉलचे पालन न करणे अशा अनेक आघाड्यांवर राज्यातील सरकार पूर्णतः अपयशी ठरले आहे. pic.twitter.com/q8ks0d8NlO
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) May 19, 2020
तसेच राज्य सरकारकडून कोणत्याही उपाययोजना होत नाहीत. त्यांच्याकडून केवळ राजकारण सुरु आहे. देशात सर्वाधिक करोनाचे रुग्ण महाराष्ट्रात आहेत. परंतु राज्य सरकारकडून करोनाता योग्यरित्या सामना केला जात नाही. अनेकांना लोकांना उपचार मिळत नाहीत. एकीकडे ही अवस्था आहे तर दुसरीकडे शेतमाल पडून आहे. त्याची व्यवस्थादेखील राज्य सरकारने केलेली नाही. शेतकऱ्यांना बियाणं मिळत नाहीत, खतं मिळत नाही, शेतकऱ्यावर संकट आले आहे, असेही फडणवीस म्हणाले.
कोरोना संकट हाताळण्यात राज्य सरकारला येत असलेल्या अपयशाबाबत लक्ष वेधण्यासाठी आज मा. राज्यपाल श्री भगतसिंह कोश्यारीजी यांना निवेदन दिले, त्यानंतर माध्यमांशी साधलेला संवाद…. https://t.co/dJ2zwIyA7a #MaharashtraBachao
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) May 19, 2020
रुग्णांना अॅम्बुलन्सही मिळत नाही. त्याअभावी रुग्णांचे मृत्यू होत आहेत. आपण एक डॅशबोर्ड बनवून रुग्णालयातील जागा सांगू शकतो. त्यामुळे रुग्णांची हेळसांड थांबेल. आता हे उघड्या डोळ्याने पाहणे शक्य नाही. तर राज्य सरकारला जी मदत हवी असेल ती करु. त्यांनी आम्हाला सांगावं. मात्र मुख्यमंत्र्यांनी पहिली बैठकच दोन महिन्यांनी घेतली. आम्ही तर सहकार्य करायला तयारच आहोत, त्यामध्ये केवळ औपचारिकता नको. आमची मदत नको असेल तर त्यांनी उपाययोजना कराव्या, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.