नवी दिल्ली – बुधवारी राज्यसभेमध्ये अभूतपूर्व गोंधळ उडाल्याचे पाहायला मिळाले. बाहेरून आलेल्या मार्शल्सने विरोधीपक्षांच्या खासदारांना मारहाण केली असा गंभीर आरोप विरोधकांनी केला आहे. तर विरोधकांनीच मार्शल्सना धक्काबुक्की केल्याचं सत्ताधारी भाजप नेत्यांचा दावा आहे.
अशातच आता केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी याबाबत भाष्य करताना, मार्शल्सवर हल्ला केल्यानंतर आपल्यावर कारवाई केली जाईल या बोटीने विरोधी पक्षाचे खासदार आमच्यावर दबाव टाकण्यासाठी आरोप करत असल्याचा दावा केला. यावेळी बोलताना त्यांनी शरद पवार यांनी केलेल्या आरोपांचे देखील खंडन केले.
“विरोधी पक्षांच्या खासदारांना भीती आहे की, संसदेच्या कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्यानंतर आपल्यावर कारवाई केली जाईल. यामुळेच ते आमच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. शरद पवार यांना माझी आग्रही विनंती आहे की, त्यांनी आमच्याकडे बोट दाखवण्याआधी आत्मपरीक्षण करावं.” असं गोयल म्हणाले.
काय म्हणाले शरद पवार?
राज्यसभेमध्ये उडालेल्या अभूतपूर्व गोंधळानंतर गुरुवारी विरोधी पक्षांच्या खासदारांचे शिष्टमंडळ उपराष्ट्रपती नायडू यांच्या भेटीसाठी गेले होते. याबाबत आपल्या ट्विटर खात्यावरून माहिती देताना पवार यांनी, ‘आपल्या ५५ वर्षांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये अशी घटना यापूर्वी कधीच पाहिली नाही.’ असं म्हंटल होत.
Opposition is scared that action will be taken against them in the wake of their attack on Parliament staff, that’s why they are trying to threaten us. I would also urge Sharad Pawar to introspect before pointing a finger at us: Union Minister Piyush Goyal pic.twitter.com/8Y7LVFeByw
— ANI (@ANI) August 12, 2021