मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आंबेडकर जयंतीबाबाबत मोठे विधान केले आहे. आंबेडकर जयंती दीड ते दोन महिने साजरी करतो; मात्र या संकटाच्या काळात आंबेडकर जयंती साजरी करणे योग्य आहे का? याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे, असं त्यांनी फेसबुक लाईव्ह माध्यमातून सांगितलं आहे.
आंबेडकर जयंती उत्सव पुढे ढकलणे शक्य आहे का? याचा करायला हवा. जयंतीनिम्मित आपण एकत्र आलो तर गंभीर समस्यां निर्माण होऊ शकते. त्यावेवजी सर्वानी डॉ. बाबासाहेबांच्या विचाराचे स्मरण करायला हवे असे पवार म्हणाले.