पुणे – शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर आज अंमल बजावणी संचालनालय अर्थात ईडीकडून कारवाई करण्यात आली. ईडीच्या या कारवाईमुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोपप्रत्यारोपांचे सत्र सुरु झालंय. अशातच आता यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही विरोधकांवर निशाणा साधला आहे.
ईडीच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, ‘ लोकांच्या प्रश्नाची उत्तरं देण्याऐवजी राजकीय विरोधकांविरोधात सरकारी तपास यंत्रणांचा वापर केला जात आहे.’ अशी टीका शरद पवारांनी यांनी केली.
‘महाराष्ट्रात पुन्हा सत्ता मिळत नाही म्हणून ईडीची कारवाई करण्यात आली’ असा आरोपही यावेळी त्यांनी लगावला. ते बीड जिल्ह्यातील भाजपाचे माजी खासदार आणि माजी मंत्री जयसिंग गायकवाड यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेश सोहळ्यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
“राज्यात लॉक डाऊन नाही, मात्र…” – आरोग्यमंत्री टोपेंची महत्वपूर्ण माहिती