बारामती – लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांत झालेल्या वादळी चर्चेनंतर नागरिकत्व सुधारणा विधेयक मंजूर झालं आहे. सध्या या विधायकाविरोधात देशभरात हिंसक विरोध प्रदर्शन सुरु आहेत.
दरम्यान, नागरिकत्व सुधारणा विधेयकावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपलं मत व्यक्त केले आहे. ते बारामतीमध्ये माध्यमांशी बोलत होते.
यावेळी पवार म्हणाले, ‘नागरिकत्व सुधारणा विधेयकास दोन्ही सभागृहात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि अन्य पक्षीय सदस्यांनी विरोध केला. याविषयी आम्ही संसदेत ठाम भूमिका मांडली. या विषयावरून आता देश पेटेल. दक्षिण-उत्तर भारतामध्ये संघर्षाचं वातावरण निर्माण होईल अशी परिस्थिती आहे’. असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.