Sharad Pawar NCP : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मोठी उलथापालथ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन्ही गटांमध्ये (शरद पवार गट आणि अजित पवार गट) विलय होण्याची (Sharad Pawar NCP) जोरदार चर्चा रंगली होती. दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांमध्ये अनेक बैठका झाल्याचीही माहिती समोर आली होती. मात्र आता शरद पवार गटाकडून याबाबत स्पष्ट नकार देण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे (Sharad Pawar NCP) यांनी आज पक्षाच्या महत्त्वाच्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना सांगितले की, दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र येणार नाहीत. त्यांनी स्पष्ट केले की, “आमचा पक्ष पवार साहेबांच्या नेतृत्वात स्वतंत्रपणे मजबूत करून पुढे जाणार आहे. विलिनीकरणाचा विषय आता संपलेला आहे.” शशिकांत शिंदे यांचे महत्त्वाचे विधान आज झालेल्या पक्ष बैठकीत संघटनात्मक बळकटीकरण, आगामी निवडणुका आणि पक्ष विस्तारावर चर्चा झाली. शशिकांत शिंदे म्हणाले, “पक्षात पूर्ण ताकतीने काम करायचे आहे. आम्ही वेगवेगळे मुद्दे हाताळणार आहोत. महाविकास आघाडी (MVA) म्हणून १५ ऑगस्टनंतर राज्यभर संयुक्त दौरे करणार आहोत आणि जनभावना उभी करणार आहोत.” Sharad Pawar NCP २२-२३ आमदारांच्या मुद्द्यावर बोलताना शिंदे म्हणाले, “आमच्याकडे असा कोणताही प्रस्ताव आलेला नाही. मात्र जर प्रस्ताव आला आणि आमदारांना शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करायचे असेल, तर आम्ही नक्की विचार करू.” २२ ते २३ आमदार शरद पवारांच्या संपर्कात दुसरीकडे, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अजित पवार गटातील २२ ते २३ आमदार सध्या शरद पवार (Sharad Pawar NCP) यांच्या संपर्कात आहेत. भाजपसोबत जाण्यास इच्छुक नसलेले हे आमदार शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत परत येण्याच्या विचारात असल्याचे समजते. काही आमदारांनी शरद पवार यांची भेटही घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. हे आमदार मुख्यतः अशा मतदारसंघातील आहेत जिथे भाजपसोबत जाण्याने स्थानिक पातळीवर नाराजी निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.