पुणे – पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर बुधवारी नंदिग्राममध्ये हल्ला झाला होता. या हल्ल्यात ममता यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. मात्र, ममता यांच्या पायाला झालेली दुखापत काहीशी बारी झाल्यानंतर आज (दि. १४) त्या रॉड शो करणार आहेत. पश्चिम बंगालसह पाच राज्यातील निवडणुकांकडे देशाचे लक्ष लागून आहे. या निवडणुकांबाबत आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
सचिन वाझेंच्या अटकेनंतर शरद पवार म्हणाले,…
पत्रकारांशी बोलतांना ते म्हणाले,’आसाम वगळता इतर राज्यात भाजपाचा पराभव होईल हा ट्रेंड असून हा पाच राज्याचा ट्रेंड देशाला दिशा देणारा ठरेल. आसाम वगळता इतर राज्यात भाजपाचा पराभव होईलच.
West Bengal Election 2021: दुखापतीनंतर ममतांचा आज व्हीलचेअरवरून रोड शो
ते पुढे म्हणाले,’पश्चिम बंगाल मध्ये केंद्र सरकार विशेषतः भाजप सत्तेचा गैरवापर करत आहे. तिथे एकटी भगिनी आपल्या राज्यातील लोकांसाठी संघर्ष करतेय. तिच्यावर राजकीय हल्ला करण्याची भूमिका भाजपने घेतली आहे. बंगालमधील लोक स्वाभिमानी आहेत. त्यांच्या बंगाली संस्कृती व बंगाली मनावर कुणी आघात करण्याचा प्रयत्न केला तर संपूर्ण राज्य एकसंघ होते आणि त्याची प्रतिक्रिया व्यक्त होते. त्यामुळे कुणी काही म्हटले तरी पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली सरकार येईल असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला.’