मुंबई : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी कॉन्फरन्सद्वारे सवांद साधला. यावेळी त्यांनी राज्यपातळीवर काही राज्यांमध्ये असे ऐकावयास मिळते की माननीय राज्यपालांकडून देखील थेट कार्यकारी वर्गाला सूचना निर्गमित होतात. राज्यपाल महोदयांना राज्याच्या बाबतीत सल्लामसलत करण्याचे अधिकार आहेत. ते त्यांनी जरूर वापरावेत. मात्र मुख्यमंत्री आणि राज्याचे मुख्य सचिव यांच्यामार्फत तसे झाल्यास राज्यात दोन सत्ताकेंद्रे होणार नाहीत. तसेच समन्वयामध्ये चूक होणार नाही असं मत पवारांनी यावेळी मांडले.
शेतकरी वर्ग व शेतीवर अवलंबून असणाऱ्या घटकांना तातडीने दिलासा देण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने पावले उचलावीत. केंद्र सरकारने राज्यसरकारचे उत्पन्न कसे वाढेल वाढेल याकडे लक्ष पुरवावे. जीएसटी करता राज्यांचा वाटा अद्याप राज्याला मिळालेला नाही. अशा राज्यांकडे तो तातडीने वर्ग व्हावा.
— Sharad Pawar (@PawarSpeaks) April 8, 2020
देशात लॉकडाऊनमुळे बऱ्याच समस्यां निर्माण झाल्या आहेत. परंतु कोरोनाचा सामना करण्यासाठी राज्यनिहाय विचार करता येईल का हे पाहावे असे पवार म्हणाले. कोरोनाबाबत काही कडक उपाय योजना आखाव्या लागतील. त्यासाठी नियोजनबद्ध खर्चावर बंधने आणावे लागतील. सरकार नवीन संसद भवन बांधण्याच्या विचारात आहे, त्याची आवश्यकता पाहून पुढील निर्णय घेता येईल का ? ते हि तपासून पाहावे. तसेच देशात रोजगाराचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. स्थलांतरितांचे रोजगार गेले आहेत. बरेच जण अनेक ठिकाणी अडकून पडले आहेत. अशा लोकांना स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून मदत करण्यात येत आहे. अशा संस्थांना सरकारने मदत करावी. ज्यांच्याकडे रेशन कार्ड, आधार कार्ड नाही अशा व्यक्तींना देखील सरकारने मदत करायला हवी. देशात अन्नसुरक्षा कायदा अंमलात आला आहे.
मात्र मुख्यमंत्री आणि राज्याचे मुख्य सचिव यांच्यामार्फत तसे झाल्यास राज्यात दोन सत्ताकेंद्रे होणार नाहीत. तसेच समन्वयामध्ये चूक होणार नाही असे मला वाटते.@PMOIndia #LetsFightCoronaTogether
— Sharad Pawar (@PawarSpeaks) April 8, 2020
त्यामुळे कोणीही उपाशी राहणार नाही याची काळजी सरकारने घ्यावी अशी विनंती पवारांनी पंतप्रधानांना केली. दिल्लीतील तबलिगीमुळे कोरोनाच्या प्रसाराची चिंता निर्माण झाली होती; परंतु तो विषय मागे ठेऊन कोरोनाचा प्रसार कसा रोखता येईल यावर लक्ष देण्याची गरज असल्याचे पवार म्हणाले. एखाद्या समाजाला दोष देणे बरोबर नाही. समाजातील समाजातील काही जण सामाजिक माध्यमातून सामाजिक रंग देण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. सामाजिक माध्यमातून जर असे प्रकार घडत असतील तर अशांचा वेळीच बंदोबस्त करायला हवा अशी मागणी त्यांनी केली.