पंढरपूर- अभिनेता सिंह राजपूतप्रकरणात सीबीआयने काय दिवे लावले, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी विचारला आहे. ते पंढरपूरमध्ये बोलत होते. ते सध्या पंढरपूरच्या दौऱ्यावर आहेत त्या दरम्यान त्यांनी हा सवाल उपस्थित केला आहे.
सुशांतच्या केसमध्ये त्याची आत्महत्या राहिली बाजूला आणि हे सगळे अन्य ठिकाणी वळत आहे, असे पवार म्हणाल. पंढरपूरमध्ये पवारांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्यावेळी त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं.
दरम्यान, सुशांतची आत्महत्या सीबीआयकडे सोपवण्यास गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नकार दर्शवला होता. या प्रकरणाचा तपास लावण्यासाठी मुंबई पोलीस सक्षम असल्याचे त्यांनी म्हटले होते. जवळपास तीन महिने होत आले तरी या प्रकरणात सीबीआयलाअजून काहीच सापडले नाही. या उलट हा तपास आत वेगळ्याच दिशेत जात असल्याचे, शरद पवार यावेळी म्हणाले.