कोल्हापूर – शारदीय नवरात्रोत्सवात तिरुपती देवस्थाकडून करवीर निवासिनी अंबाबाई देवीला शालू अर्पण करण्यात येतो. प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या उत्सवानिमित्त गुरुवारी (ता. १४ ऑक्टोबर) तिरुपती देवस्थाकडून शाल देवीला अर्पण करण्यात आला. देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवडे यांनी हा शालू स्वीकारला. हा शालू गुलाबी रंगाचा सोनेरी काठ पदराचा आहे. एक लाख सात हजार ३० रुपये इतकी त्याची किंमत आहे.
तिरुपतीवरून कोल्हापूरच्या करवीर निवासिनी अंबाबाईला प्रत्येक वर्षी मानाचा शालू पाठवण्याची एक प्रथा आहे. त्यानुसार यावर्षी सुद्धा तिरुपतीवरून आलेला मानाचा शालू आज पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडे सुपूर्द करण्यात आला. पारंपारिक रितीरिवाजाप्रमाणे हा सोहळा पार पडल्यानंतर आई अंबाबाईला हा शालू अर्पण करण्यात आला. गेल्या अनेक वर्षा पासून तिरुमला तिरुपती देवस्थान कडून आई अंबाबाई ला शालू पाठवण्याची प्रथा आहे.
ही प्रथा जपत या वर्षी शुक्रवारी सकाळी हा शालू अंबाबाई मंदिरात वाजात गाजत आणि देवाचे नाव घेत तिरुमला देवस्थानचे ट्रस्टी एम. रमेश बाबू परिवार आणि एम कांचना,वेद प्रण्यम, पंडित संपत कुमार यांनी आणले तर यावेळी रीती रिवाजा प्रमाणे पश्चिम देवस्थान समिती कडून त्यांचे स्वागत करण्यात आले. तिरुपतीवरून अंबाबाईस आलेल्या या शालूस मोठा महत्व आहे.गुलाबि सोनेरी चमक असलेला जवळपास 1 लाख 7 हजार 730 रुपयाचा शालू अंबाबाईला अर्पण करण्यात आला.