मुंबई : मुंबई : वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाटमधील पीडितेच्या मृत्यूनंतर आरोपील कठोर शिक्षा होण्याची मागणी करण्यात येत आहे. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. पीडितेच्या मृत्यूनंतर मनसे नेत्या शालिनी ठाकरे यांनी अतिशय भावनिक पत्र लिहले आहे.
दाराडो गावातील शिक्षिकेला जाळून मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. या जळीतकांडात पीडिता ४० टक्के जळाली. तिचा सोमवारी दुर्दैवी मृत्यू झाला असून पीडितेवर अंत्यसंकर करण्यात आले आहे.
@mnsadhikrut @abpmajhatv @KirtikumrShinde @ANI @News18lokmat @mataonline @SakalMediaNews @VrushaliGYadav @LoksattaLive @MiLOKMAT @zee24taasnews @News18India @saamTVnews @JaiMaharashtraN @Maharashtra1tv pic.twitter.com/N22dIsaG6u
— Shalini Thackeray (@ThakareShalini) February 10, 2020
हिंगणघाटमधल्या घटनेतील पीडितेच्या सोमवारी सकाळी मृत्यू झाला. ३ फेब्रुवारीला पीडितेवर आरोपीने पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला होता. यात पीडित ४० टक्के भजली होती. या घटनेनंतर राज्यात ठिकठिकाणी निदर्शने करण्यात येत होते.दरम्यान मनसेच्या नेत्या शालिनी ठाकरे यांनी पीडितेला उपरोधिक पत्र लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या आहे.