मुंबई – बॉलिवूड स्टार शाहिद कपूर त्याच्या प्रोफेशनल लाईफमुळे अनेकदा चर्चेत असतो. पण याशिवाय तो त्याच्या पर्सनल लाईफबद्दलही खूप चर्चेत राहतो. शाहिद कपूर आणि त्याची पत्नी मीरा राजपूत यांचे नाव बॉलिवूडच्या बेस्ट कपलच्या यादीत आहे. अशातच सध्या शाहिद अन् मिराची इटली ट्रिप चांगलीच चर्चेत आहे. मीरा राजपूतसोबत असे काही घडले की तिला राग आवरता आला नाही. मीराने सोशल मीडियावर आपला राग व्यक्त केला आहे.
मीराने इटली ट्रिपचे सोशलवर फोटो आणि व्हिडिओ पोस्ट केले आहे. मीराची ट्रीप छान चालली होती. पण याचदरम्यान असं काही घडलं की मीराला राग आला. इटलीतील सिसिली शहराचे वर्णन करताना मीरा राजपूतने तेथील हॉटेलमध्ये व्हेज फूड न मिळाल्याबद्दल सांगितले आहे.
तिने इंस्टाग्राम स्टोरी वर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने हॉटेलला टॅग केले आहे, आणि लिहिले की,’जर तुम्ही भारतीय आहात आणि शाकाहारी देखील आहात, तर हे हॉटेल वगळा. शाकाहारी लोकांना आरामदायक वाटण्याचा प्रयत्न न करता अतिशय मर्यादित अन्न पर्याय. खराब लिनेन आणि गलिच्छ चादरी.… आता पालेर्मोला जात आहे.’
असं म्हणत मीरा पुढे लिहिते,’ज्या काळात शाकाहार ही एक जागतिक चळवळ आहे आणि जीवन जगण्याची एक स्वीकारलेली पद्धत आहे (5-7 वर्षांपूर्वी जेव्हा अंड्यांशिवाय काहीही बनवणे ऐकले नव्हते) तेव्हा ते निराशाजनक आहे. जेव्हा मोठी हॉटेल्स गट अन्नाच्या गरजांबद्दल असंवेदनशील असतात.’ असेही तिने लिहिले आहे. मीराच्या व्यतिरिक्त शाहिद कपूरने देखील आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर हे शेअर केले आहे.
मीराने काही ओळींमध्ये हॉटेलबद्दल बरेच काही सांगितले आहे. परदेशात जाऊन त्यांचे जे काही झाले. असं व्हायला नको होतं. मीरा राजपूतने सोशल मीडियावर कोणत्याही विषयावर उघडपणे बोलण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही मीराने सोशल मीडियावर अनेक गंभीर विषयांवर आवाज उठवला आहे.