नवी दिल्ली : सुधारीत नागरीकत्व कायद्याच्या विरोधातील निदर्शनाचे केंद्रस्थान बनलेल्या शाहीनबाग स्वच्छ करण्यास एकदा आठ फेब्रुवारीच्या मतदाननंतर भाजपा सत्तेवर आल्यावर करण्यात येईल, असे केंद्रीय मंत्री अनुरा ठाकूर यांनी सांगितले.
निवडणूक प्रचारात वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी ठाकूर यांना प्रचारास बंदी घातल्याच्या निर्णयानंतर ठाकूर यांनी हे वक्तव्य केले. शाहीन बाग निदर्शकांना मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया पाठीशी घालत असल्याचा आरोप त्यांनी केला.
दिल्लीच्या लोकांनी एकदा कमळाला मतदान केले आणि त्यानंतर 11 फेब्रुवारीला निकाल लागला की शाहीनबाग स्वच्छ करण्यास सुरवात करण्यात येईल. भाजपा कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात ठाकूर बोलत होते. या निदर्शकांना गोळ्या घातल्या पाहिजेत असे विधान केल्याने ठाकूर यांना 72 तास प्रचारबंदीची शिक्षा निवडणूक आयोगाने दिली होती.