ना. माधव भांडारी : केंद्र सरकारकडे प्रस्ताव सादर
पुरग्रस्तांना मदत
सांगली, कोल्हापूर येथील पुरग्रस्तांना यावेळी श्रध्दांजली अर्पन करण्यात आली. त्याचबरोबर श्री.काळेश्वरी देवस्थान ट्रस्ट कुसुंबी व शाहिद कोंडीबा गोपाळ मरागजे स्मृती मराजगे परिवार यांचे वतीने आकरा हजार रूपयांचा धनादेश, 100 शाली व 5000 बिस्कीट पुढ्यांचे बॉक्स तहसीलदार रोहिणी आखाडे यांचेकडे सुपुर्द करण्यात आले.
सातारा – देशाचे संरक्षण करण्यासाठी सातारा जिल्ह्याने देशाला पारतंत्र्य काळापासून जवानांची मोठी परंपरा निर्माण केली. प्रसंगी देशासाठी बलिदान दिले आहे, अशा सैनिकांचा देशवासीयांना अभिमान असून त्यांनी केलेले कार्य हे कायमस्वरूपी स्मरणात राहावे म्हणून राज्य व भारत केंद्र शासनस्तरावर घरकुलांचा प्रस्ताव सादर केला असून तो लवकरच मंजूर करून घेण्यात येईल, असे प्रतिपादन पुनर्वसन प्राधिकरणचे उपाध्यक्ष ना. माधव भांडारी यांनी केले.
श्री काळेश्वरी देवस्थान ट्रस्ट कुंसुबी, स्व.भि.दा.भिलारे स्मारक समितीच्यावतीने मेढा, जवळवाडी ता. जावळी येथील शहीद जवान कोंडीबा गोपाळ मरागजे यांचे स्मृती जन्मशताब्दी वर्ष कार्यक्रमात ते बोलत होते. भांडारी म्हणाले, दुर्गम भागातील शेतकऱ्यांच्या मुलांनी देशसेवेसाठी केलेले बलिदान जनता कधीही विसरणार नाही. त्यांच्या बलिदानाच्या स्मृतिजतन संयोजकांनी केल्याबद्दल त्यांच्या स्मृतींना कायम उजाळा देण्याचे काम सर्वसामान्यांनी केल्यास देशातील सर्वच सैनिकांना ऊर्जा मिळेल, असे भांडारी यांनी सांगितले. पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळाचे अध्यक्ष ना. दिपक पवार म्हणाले, देव, देश आणि धर्मासाठी लढणाऱ्या सैनिकांनी देशातील जनतेने कायम संरक्षणच केले आहे. त्यांच्या पाठीवर थाप देण्याची तयारी ठेवली म्हणूनच आज आपल्या देशासाठी बलिदान होणाऱ्या सैनिकांची संख्या देशात सातारा जिल्ह्यात सर्वाधिक आहे.
दरम्यान, यावेळी आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, तहसीलदार रोहिणी आखाडे, सहा. पोलीस निरीक्षक नीलकंठ राठोड यांनी स्मृतिस्तंभास अभिवादन केले. जावळी वाई येथील शहिदांच्या बलिदानातून देश संरक्षित राहिला असून देशातील सर्वाधिक जवानांच्या परिवारास जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सर्वोतपरी सहकार्य करण्याचे आश्वासन जिल्हा परिषद उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे यांनी दिले. प्रारंभी माजी आमदार सदाशिवराव सपकाळ यांनी आपले विचार मांडले. यावेळी शंभर वर्षातील शाहिदांचा कार्यावर गौरव शहीद गाथा या पत्रकार मोहन जगताप संकल्पित व चंद्रशेखर सावंत संपादित गौरव अंकाचे मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशन करण्यात आले व जावळी महाबलेशवर वाई येथील हुतात्मा व शाहिद व शॉर्यप्राप्त सैनिकांच्या परिवाराचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास मेढा नगर पंचायतीचे उपनगराध्यक्ष पांडुरंग जवळ, शिवसेना नेते पार्टे गुरुजी, जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य एकनाथ ओंबळे, आदिनाथ ओंबळे, गटविकास अधिकारी संताजी पाटील, गट शिक्षणअधिकारी रमेश चव्हाण उपस्थित होते. प्रस्ताविक बळवंत पाडळे यांनी तर उपस्थितांचे स्वागत माजी जिल्हा परिषदेच्या सदस्या कविता जगताप यांनी केले. कार्यक्रम यशस्वी पार पडण्यासाठी किसनराव चिकणे बाजीराव चिकणे विजय वेंदे व राजेंद्र भिलारे राजेंद्र निकम गीता लोखंडे यांनी परिश्रम घेतले तर विठ्ठल माने यांनी आभार मानले.