मुंबई – मोदी पुन्हा निवडून आले तर भारत सोडून जाईन असे विधान अभिनेत्री शबानी आझमी यांनी केल्याचे वृत्त सध्या सोशल मिडीयावर प्रसारीत केले जात आहे. त्याला शबानांनी जोरदार आक्षेप घेतला आहे. ही सरळसरळ फेक न्युज आहे असे त्यांनी म्हटले आहे. आपल्या ट्विटर अकौंटवर यावर प्रतिक्रीया देताना त्यांनी म्हटले आहे की माझ्या नावावर खपवले जाणारे हे विधान पुर्ण बोगस आणि बनावट आहे.
मी असे कधीही म्हटलेले नाही. आणि देश सोडून जाण्याचा विचारही माझ्या मनात नाही. ज्या देशात माझा जन्म झाला तिथेच मी मरणार आहे. माझ्या विषयी असल्या फेक न्युज पसरवणाऱ्या ब्रिगेडचा आपण निषेध करीत आहोत असेही त्यांनी यात नमूद केले आहे. ही खोट्या बातम्या पसरवणारी ब्रिगेड मूळ विषयांपासून आणि प्रश्नांपासूनलोकांना अन्यत्र भटकवण्याचा प्रयत्न करीत आहे. अशा खोट्या बातम्या वारंवार पसरवून लोकांना त्यावर विश्वास ठेवायला भाग पाडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो असेही त्यांनी म्हटले आहे.