सोलापूर – सोलापूर जिल्ह्यातील जुनोनीजवळ पायी दिंडीमध्ये कार घुसल्याने सात वारकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. तर 8 जण गंभीर जखमी असल्याची प्राथमिक माहिती. हे वारकरी कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील जठारवाडी गावातील आहेत. जखमी वारकऱ्यांवर रुग्णालयात उपचार सुरु आहे.
करवीर तालुक्यातील जठारवाडी गावातील वारकरी कार्तिक वारीनिमित्त विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे पायी निघाले होते. मात्र वाटेत जुनोनी गावाजवळ सायंकाळच्या सुमारास एक भरधाव कार थेट दिंडीत घुसली. या अपघातात 15 वारकरी गंभीर जखमी झाले होते. यातील 7 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये पाच महिला, एक पुरुष आणि एका लहान मुलाचा समावेश आहे. या घटनेने वारकरी संप्रदायावर शोककळा पसरली आहे.