सहभागनगर – लॉकडाऊनच्या काळात रोजगार बुडाल्याने अनेक कुटुंबांना दोन वेळच्या जेवणाची अडचण निर्माण झाली आहे. अशा साधारण सात हजार कुटंबांना मोफत किराणा देण्याची तयारी नगरमधील प्रेरणा प्रतिष्ठानातर्फे करण्यात आली आहे.
आमदार संग्राम जगताप यांनी त्यासाठी पुढाकार घेतला असून, या उपक्रमात नगरमधील अनेक व्यापरी व उद्योजक मदतीसाठी पुढे आले आहेत. त्यातही लॉकडाऊनची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी आमदार जगताप यांच्या संकल्पेतून हा किराणा घरपोच देण्यात येणार आहे. त्यामुळे तो स्वीकाणण्यासाठी कुठेही गर्दी होणार नाही, याची दक्षता घेण्यात येणार आहे.
जीवनावश्यक वस्तू गव्हाचे पीठ सुमारे 25 टन, साखर 5 टन, तूर 5 टन, तेल 5 हजार लीटर, बेसपीठ अडीच टन, मसाले, चहा पावडर, जीरे, मोहरी, बिस्कीटे, मीठ, लाईफबॉय व रिन साबन
हातावर पोट असलेल्या घटकांचा
प्राधान्याचे विचार :आ. संग्राम जगताप
लॉकडाऊनच्या काळात मुख्यत्वे कुठेच गर्दी होऊ नये, म्हणून हा किराणाही काही मोजक्याच कार्यकर्त्यांमार्फत घरपोच देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. कोणीही घराबाहेर पडू नये. आजोबा बलभिम जगताप व आमदार अरुण जगताप यांच्या वारकरी विचारांची प्रेरणा घेऊनच हा मदतीचा हात देण्याचा निर्णय घेतला.
त्याला अनेक व्यापारी व उद्योजकांनी मोलाची साथ दिली, ही खूप मोठी समाधानाची बाब आहे. नगरमध्ये हातावर पोट भरणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. उद्योगधंदेच बंद असल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊ नये, म्हणून हा पुढाकार घेतला. विशेष म्हणजे कोणीही घराबाहेर पडू नये, शासनाच्या नियमांचे उल्लंघन होऊ नये, ही या पाठीमागील प्रमुख भावना असल्याचे आमदार संग्राम जगताप यांनी सांगितले.