हज यात्रेसाठी निघालेल्या सौदागर कुटुंबियांवर काळाची झडप
नागठाणे – पुणे-बेंगळुरू महामार्गावर काशीळ (ता. सातारा) गावाच्या हद्दीत धारवाड येथील सौदागर कुटुंबीयांवर बुधवारी पहाटे काळाने झडप घातली. कारवरील चालकाचा ताबा सुटल्याने झालेल्या भीषण अपघातात सौदागर कुटुंबातील सातही जणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन पुरुष, दोन महिला आणि तीन लहान मुलांचा समावेश आहे. या अपघातातून चालक बचावला असून गंभीर जखमी झाला आहे.
निजामउद्दीन अब्दुलनबी सौदागर (वय 69), सफुरा निजामउद्दीन सौदागर (वय 58), मनसुफ निजामउद्दीन सौदागर (वय 40), नफीसा मनसुफ सौदागर (वय 35), आकसा मनसुफ सौदागर (वय 4), अहमद रजा मनसुफ सौदागर (वय 2), तय्यबा मनसुफ सौदागर (वय 6, रा. मदिहाळ डेअरी रोड, धारवाड) अशी अपघातातील मृत कुटुंबीयांची नावे आहेत. अधिक माहिती अशी, धारवाड येथील सौदागर कुटुंबातील निजामुद्दीन सौदागर व त्यांच्या पत्नी