नवी दिल्ली : पाकिस्तानने भारतासोबतच व्यापारी संबंध तोडल्यानंतर आता सर्व प्रकारच्या संबंधावर निर्बंध आणण्याच्या तयारीत पाक असल्याचे दिसत आहे. त्यातच भारत-पाकिस्तानदरम्यान धावणारी समझोता एक्सप्रेस रेल्वे पाकने बंद करण्याचा निर्णय घेतला. गुरूवारी ही रेल्वे वाघा बॉर्डरवर थांबवण्यात आली होती. दरम्यान, आज समझोता एक्सप्रेस भारतात दाखल झाली आहे.
दिल्ली रेल्वे स्थानकावर आज समझोता एक्सप्रेस दाखल झाली. रेल्वेत 76 भारतीय आणि 41 पाकिस्तानचे प्रवासी प्रवास करत होते. गुरूवारी ही रेल्वे बंद करण्याचा निर्णय झाल्यानंतर रेल्वेचे चालक अटारी रेल्वेस्थानकावर रेल्वेसोडून निघून गेले होते.परंतू, आज पहाटे 1.30 वाजता भारतीय चालक आणि गाईड यांनी ही रेल्वे दिल्लीत घेवून आले.