कोल्हापूर : कोल्हापूरच्या राधानगरी अभयारण्य परिसरात आज मोठ्या प्रमाणावर वनवा पेटला. त्यामुळे अभयारण्यात आग लागली असून सुमारे 100 एकर परिसरातील जैवविविधतेची हानी झाली आहे.
आगीचा तडाखा इतका भीषण होता की बघता, बघता शेकडो एकर परिसरातील वनसंपदा बेचिराख झाली. कोल्हापूर काळम्मावाडी मार्गावर गैबी वन तपासणी नाक्यापासून अवघ्या काहर अंतरावर ही आग लागली.
ही आग अद्यापही सुरूच असून प्रशासनाला जाग आली नसल्याचे दिसून येत नाही. दुसऱ्या बाजूला या मार्गावरून ये-जा करणाऱ्या काही नागरिकांनी ही आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र सुमारे तासभराच्या प्रयत्नानंतरही ही आग आटोक्यात आणता आली नाही.
त्यामुळे त्यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनाही कळविले आहे. दरम्यान ही बातमी प्रशासनाला समजल्यानंतर याची गंभीर दखल घेत आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यानंतर जवळपास दोन ते अडीच तासाच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली आहे. मात्र या आगीमुळे वन्यजीव आणि वृक्ष संपलेला मात्र मोठा धोका निर्माण झाला आहे.