संयुक्तराष्ट्रे,- जागतिक तापमान वाढीच्या संबंधात संयुक्तराष्ट्रांनी नेमलेल्या समितीने आपला सहावा अहवाल सादर केला असून त्यात पर्यावरणाच्या हानी बद्दल गंभीर इशारे देण्यात आले आहेत. पर्यावरणाचा वेगाने होणारा ऱ्हास व जागतिक तापमान वाढीसाठी कार्बन व अन्य घातक वायुचे उर्त्सजन रोखण्यासाठीचे जे उद्दीष्ठ देण्यात आले आहे ते साध्य होण्याच्या बाबतीत जे अडथळे निर्माण केले गेले आहेत ते तातडीने दूर होण्याची गरजही यात व्यक्त करण्यात आली आहे.
या अहवालात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की पृथ्वीच्या सर्वच भागात तापमान वाढीने मोठे नुकसान केले असून जगातले तापमान धोकादायक पद्धतीने वाढत आहे. सन 2030 पर्यंत पृथ्वीचे तापमान 1.5 अंश सेल्सीयसने वाढणार आहे.
समुद्राची पातळीही वेगाने वाढत आहे. 1901 ते 1971 या अवधीत समुद्राची पातळी दरवर्षी 1.3 मिलिमीटर वेगाने वाढत होती. पण सन 2006 ते 2018 या अवधीत समुद्राची पातळी तब्बल 3.7 मिलिमीटरने वाढली आहे. कमालीची थंडी आणि कमालीची उष्णता हे प्रकार पृथ्वीच्या सर्वच ठिकाणी दिसून येत आहेत.
शहरांमधील घडामोडींमुळे ग्लोबल वॉर्मिंगचे प्रमाण वाढत असल्याने शहरे या प्रक्रियेत हॉटस्पॉट ठरली आहेत. त्यामुळे मोठा पाऊस आणि मोठा दुष्काळ ही संकटे वारंवार उद्भवणार असा इशाराही या अहवालात देण्यात आला आहे.