पुणे : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे आतापर्यंत ४१ जणांचा मृत्यू झाला आहे. या विषाणूचा प्रादुर्भाव रेखण्यासाठी पुण्याच्या नायडू रुग्णालयात स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला आहे. चीनमधून आलेल्या मुंबईतील दोन संशयित रुंगणना कस्तुरबा रुग्णालयात दखल करण्यात आले आहे. या रुग्णांचे नमुने पुण्यातील (एनआयव्ही) राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे.
राज्य सर्वेक्षण अधिकारी, आरोग्य विभाग डॉ. प्रदीप आवटे म्हणाले कि, कोरोनाबाधित देशांतून मुंबईत आलेल्या एकूण सहा प्रवाशांपैकी दोघांना ताप होता. त्यामुळे दक्षता म्हणून त्यांना कस्तुरबा रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांचे नमुने तपासणीसाठी एनआयव्हीकडे पाठविण्यात आले आहेत.
संशयित रुग्णांवर उपचारासाठी मुंबईत कस्तुरबा व पुण्यात नायडू रुग्णालयात स्वतंत्र कक्ष करण्यात आले आहेत. पण सध्या कस्तुरबा रुग्णालयावर अधिक भर दिला जाणार आहे. गरज भासल्यास नायडू रुग्णालयातही रुग्णांवर उपचार केले जातील.
या विष्ण्यामुळे चीनमध्ये भीतीचे वातावरण आहे. तसेच अमेरिका, दक्षिण कोरिया, थायलंड, जपान या देशात कोरोना विषाणूचे रुग्ण आढळून आले आहे. या पार्श्वभूमीवर देशाच्या सात आंतरराष्ट्रीय विमानतळांवर प्रवाशांची कसून तपासणी करण्यात येत आहे.
आतापर्यंत मुंबई विमानतळावर १७३९ प्रवाशांची तपासणी करण्यात आली आहे. जे प्रवाशी कोरोना बाधित देशातून येइल त्यांची माहिती विमानतळ अधिकारी सरकारला देत आहे. या विषाणूचा रुग्ण आढळल्यास सरकारशी संपर्क साधण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.