मुंबई : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊनमध्ये ३ मेपर्यंत वाढ करण्यात आली आहे. अशामध्ये मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून २० विमान उड्डानाद्वारे सुमारे ३७०० परदेशी नागरिकांना त्यांच्या देशात पाठविण्यात आले आहे. बुधवारी विमानतळावरील एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली.
कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी घोषीत करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात आंतरराष्ट्रीय आणि देशव्यापी विमानसेवा बंद करण्यात आल्या आहेत. या संकटाच्या काळात वेगवेगळ्या देशातील अनेक विमान कंपन्या आणि दूतावासांच्या मदतीने छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन परदेशी नागरिकांना त्यांच्या देशात पाठवण्यात आले आहे.
भारतात अडकलेल्या लंडन, अटलांटा, पॅरिस, फ्रँकफर्ट, सिंगापूर, टोकियो आणि इतर देशाचे जवळपास ३७०० नागरिक अडकले होते. त्यांना २० विमान उड्डाणाद्वारे त्यांच्या देशात पाठवण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन सांगण्यात आले आहे की, परदेशी प्रवाशांना सोडताना विमानतळ आणि बोड्रिंग येथे प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी सर्व खबरदारी घेण्यात आली होती. यासाठी विमानतळावर प्रवेश केल्यापासून विमानात चढण्यापर्यंत विमानतळाने कठोर तपासणी प्रक्रिया सुरू केली. ही प्रक्रिया येणार्या प्रवाशांनाही तितकीच लागू असणार आहे.