निश्चित दरापेक्षा घेतले जातात जास्त पैसे; जिल्ह्यात ज्येष्ठ नागरिकांची सव्वालाख स्मार्ट कार्डची नोंदणी
नगर – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने ज्येष्ठ नागरिक, विविध पुरस्कार प्राप्त व्यक्ती, अधिस्विकृतीधारक पत्रकार व इतर विविध घटकांतील व्यक्तींना प्रवास भाड्यात सवलती देण्यात आला आहेत. ज्येष्ठ नागरिकांना वर्षाकाठी 4 हजार तर पत्रकारांसाठी 8 हजार कि.मी. प्रवासाची मर्यादा घालून दिलेली आहे. हे कार्ड काढण्याचा ठेका ट्रायमॅक्स कंपनीला देण्यात आला आहे. मात्र या कंपनीने उपठेकेदार नेमले असून ते ज्येष्ठ नागरिकांकडून निश्चित केलेल्या दरापेक्षा जास्त रक्कम आकारत आहेत. त्यामुळे स्मार्ट कार्डच्या नावाखाली नागरिकांची एक प्रकारे लुटच सुरु आहे.
प्रवासाची मर्यादा सवलत घेणाऱ्यांकडून पाळली जाते का, याची शहानिशा करण्यासाठी महामंडळाने स्मार्ट कार्ड’ प्रणाली अवगत करण्यात आली आहे. सवलतीचा लाभ घेणाऱ्या सर्वांना स्मार्ट कार्ड वाटप करण्याची प्रक्रिया महामंडळाकडून सुरु आहे. जिल्ह्यात सव्वालाख ज्येष्ठ नागरिकांची स्मार्ट कार्डसाठी नोंदणी झाली असून महामंडळाकडून 75 हजार 340 नोंदणी करण्यात आली आहे. तर उर्वरित नोंदणी ही सब ठेकेदारांकडून करण्यात आली आहे.
एसटी महामंडळात नोंदणी केल्यास एका व्यक्तीस 50 रुपये आकारले जातात. तर ठेकेदाराकडे नोंदणी केल्यास 70 रुपये फी ठरवून देण्यात आली आहे. मात्र हे ठेकेदार एका व्यक्तीकडून 120 रुपये सर्रास घेत आहे. त्यामुळे ज्येष्ठांची एक प्रकारे लुटच सुरु आहे. शहरात चार पाच ठिकांनी हे सेंटर सुरु आहे. याकडे संबंधित विभागाने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.
एसटी ही राज्यभरातील सर्वच रस्त्यांवर धावत असून, शाळा, महाविद्यालयाचे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने ज्येष्ठ नागरिक, विविध पुरस्कार प्राप्त व्यक्ती, अधिस्विकृतीधारक पत्रकार व इतर विविध घटकांतील व्यक्तींना प्रवास भाड्यात सवलती दिली जाते. ज्येष्ठ नागरिकांना वर्षाकाठी 4 हजार आणि पत्रकारांसाठी 8 हजार कि.मी. प्रवासाची मर्यादा घालून दिलेली आहे. प्रवासाची मर्यादा सवलत घेणाऱ्यांकडून पाळली जाते का?, याची शहानिशा करण्यासाठी महामंडळाने स्मार्ट कार्ड’ प्रणाली अवगत केली आहे.
सवलतीचा लाभ घेणाऱ्या सर्वांना स्मार्ट कार्ड वाटप करण्याची प्रक्रिया महामंडळाकडून सुरु आहे. शाळा, महाविद्यालयांत शिक्षण घेणाऱ्या बहुतांश विद्यार्थ्यांना 66 टक्के प्रवास भाड्यात सवलत मिळाली आहे. त्यामुळे खेड्यांतील मुले शहरात येऊन शिक्षण घेत आहेत. मुलींना देखील बारावीपर्यंत मोफत प्रवास करण्याची सवलत दिली आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी मात्र प्रवास भाड्यात 50 टक्के सवलत दिली आहे. या नागरिकांना देखील वर्षभरात फक्त 4 हजार किलोमीटरपर्यतच प्रवास करण्याची मर्यादा घातलेली आहे.
ही सवलत गेल्या अनेक वर्षांपासून सुरु आहे. त्यामुळे सवलतीचा लाभ घेणारे ऊठसूट महामंडळाच्या लालपरीचा लाभ घेऊ लागले आहेत. राज्यभरातील देवदर्शन, लग्नकार्य, पर्यटन क्षेत्र आदी ठिकाणी जाण्यासाठी महामंडळाच्या लालपरीचा आसरा घेतला जात आहे. अशा परिस्थितीत महामंडळाने घातलेली 4 आणि 8 हजार किलोमीटरची मर्यादा कोणाच्या लक्षात येत नाही. परिणामी महामंडळाच्या सर्वच गाड्या हाऊसफूल धावत आहेत.
मात्र म्हणावा असा आर्थिक फायदा महामंडळाला झाला नाही. जिल्हाभरातील प्रत्येक आगारात सवलतीदारांना स्मार्ट कार्ड वितरित करण्याचे काम सुरु आहे. हे कार्ड उपलब्ध झाल्यास सवलतीदारांनी किती किलोमीटर प्रवास केला, याचा हिशेब या कार्डाव्दारे समजणार आहे. किलोमीटरची मर्यादा पूर्ण केल्यास आगामी प्रवासासाठी मात्र सवलतीदारांना पूर्ण तिकीट काढून प्रवासा करावा लागणार आहे.
स्मार्ट कार्डची आगारनिहाय आकडेवारी
तारकपूर- 11 हजार 982, शेवगाव- 5 हजार 795, जामखेड- 7 हजार 710, श्रीरामपूर-4 हजार 738, कोपरगाव- 8 हजार 90, श्रीगोंदा- 9 हजार 926, संगमनेर-6 हजार 749, पारनेर-4 हजार 525, नेवासा-4 हजार 497, पाथर्डी-3 हजार 948, अकोले-7 हजार 380, असे एकून 75 हजार 340 ज्येष्ठ नागरिकांची स्मर्ट कार्डची नोंदनी करण्यात आली आहे.