नवी दिल्ली : ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री बुट सिंग यांचे आज सकाळी दीर्घ आजाराने निधन झाले. ते 86 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलं आणि मुलगी असा परिवार आहे.
Former Union Minister, former MP from Rajasthan and Congress leader Buta Singh passes away.
— ANI (@ANI) January 2, 2021
बुटासिंह हे माजी दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या विश्वासू सहकाऱ्यांपैकी एक होते. बुटा सिंह यांच्या निधनावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही शोक व्यक्त केला आहे. बुटा सिंग यांनी केंद्रीय गृहमंत्री, कृषी मंत्री, रेल्वे मंत्री, क्रीडा मंत्री आदी पदे भूषवितानाच बिहारचे राज्यपाल आणि राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्षपदही सांभाळले होते.
पंजाबमधील जालंधर जिल्ह्यात बुटा सिंग यांचा जन्म झाला. दलित नेता अशी त्यांची ओळख होती. ते तब्बल 8 वेळा लोकसभा खासदार होते पंजाबमधील अकाली दल पक्षाकडून पहिली निवडणूक लढवणाऱ्या बुटा सिंग यांनी 1960 मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर 1962 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत ते पहिल्यांदा विजयी झाले.
त्यांनी राजकीय कारकीर्दीमध्ये वेगवगळी पदं भुषवली. राजीव गांधी यांच्या मंत्रिमंडळात ते सुरुवातीला कृषीमंत्री आणि नंतर गृहमंत्री होते. त्याचबरोबर बुटा सिंग 2004 ते 2006 या काळात बिहारचे राज्यपाल होते. डॉ. मनमोहन सिंग यांच्या सरकारच्या कार्यकाळात राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले.
Shri Buta Singh Ji was an experienced administrator and effective voice for the welfare of the poor as well as downtrodden. Saddened by his passing away. My condolences to his family and supporters.
— Narendra Modi (@narendramodi) January 2, 2021
सरदार बूटा सिंह जी के देहांत से देश ने एक सच्चा जनसेवक और निष्ठावान नेता खो दिया है।
उन्होंने अपना पूरा जीवन देश की सेवा और जनता की भलाई के लिए समर्पित कर दिया, जिसके लिए उन्हें सदैव याद रखा जाएगा।
इस मुश्किल समय में उनके परिवारजनों को मेरी संवेदनाएँ।
— Rahul Gandhi (@RahulGandhi) January 2, 2021
श्री बुटा सिंग जी गरीब आणि दलितांच्या कल्याणासाठी एक अनुभवी प्रशासक आणि प्रभावी आवाज होते. त्यांच्या निधनानं मी दु:खी आहे. त्यांचा परिवार आणि समर्थकांबद्दल मी संवेदना व्यक्त करतो.” तर, ‘देशाने एक सच्चा लोकसेवक आणि निष्ठावंत नेता गमावला’, अशी भावना राहुल गांधी यांनी व्यक्त केली आहे.