मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणातील गोंधळाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने पुन्हा एकदा ५०:५० च्या फॉर्म्युल्यावरून भारतीय जनता पक्षावर टीका केली. शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले की, भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जागावाटपाच्या ‘५०:५०’ फॉर्म्युल्याची वेळेत माहिती दिली असती तर महाराष्ट्राला सध्याच्या राजकीय संकटातून जाण्याची गरज नसती. जागावाटपाच्या निर्णयाबद्दल भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी पंतप्रधानांना ‘अंधारात ठेवले’ आहे का? असा प्रश्न राऊत यांनी उपस्थित केला.
अमित शहा यांनी बुधवारी म्हटले होते की, मुख्यमंत्रीपदाची वाटणी करण्यासह शिवसेनेच्या अनेक मागण्या भाजपला ‘मान्य नाहीत’. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा भाजपने युतीतील भागीदाराबरोबर मुख्यमंत्रिपदाची वाटणी करण्याचे मान्य केले होते, असा दावाही अमित शहा यांनी फेटाळून लावला. मोदींच्या निवडणूक प्रचारादरम्यान पंतप्रधान मोदींनी ‘किमान १०० वेळा’ जनतेला नमूद केले होते की, जर भाजप-शिवसेना युतीला बहुमत मिळाले तर देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होतील.
यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली की, “शहा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना ५०:५० च्या फॉर्म्युलाबद्दल वेळेवर माहिती दिली असती तर आज आपण या परिस्थितीला तोंड देणार नसतो.” राजकीय संकटामुळे आता महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट आहे.
मला आश्चर्य वाटते की भाजप आणि वरिष्ठ नेते यांनी मोदी आणि त्यांच्यात शिवसेना यांच्यातील जागावाटपाच्या कराराबाबत अंधारात ठेवले. शाह आणि ठाकरे यांच्यात शिवसेना प्रमुखांच्या निवासस्थानी (फेब्रुवारीमधील लोकसभा निवडणुकीपूर्वी) बैठक झाली. बैठक दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे रेखाचित्र असेलेल्या कक्षेत होती, आमच्यासाठी ते मंदिर आहे. त्या मंदिरात संभाषण झाले. त्यामुळे कोणी म्हटलं की कोणतेही वचन दिले नाही. तर हा मंदिर, बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्राचा अपमान आहे. कारण ती खोली शिवसैनिकांसाठी एक पवित्र स्थान असल्याचे राऊत म्हणाले.