देशात नागरिकत्व सुधारणा कायदा लागू करण्यात आला आहे. हा कायदा कोणाचेही नागरिकत्व घेणारा नाही, तर हा कायदा नागरिकत्व देणारा कायदा आहे अस स्पष्टीकरण भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शहानवाज हुसेन यांनी दिले आहे.
स्वातंत्र्यानंतर अफगाणिस्तान पाकिस्तान, बांगलादेश जे अल्पसंख्यांक राहत होते, त्याच्यावर अन्याय झाला अशा नागरिकांना नागतिकता देण्यात आली आहे. काँग्रेस संपूर्ण देशाच्या मुसलमानांना भीती दाखवत असल्याचा आरोप त्यांनी केला.
काँग्रेसने वीर सावरकरांचा अपमान केला त्या काँग्रेस सोबत शिवसेना सत्तेत कशी राहते असा प्रश्न त्यांनी केला. शिवसेनेला सत्ता पाहिजे कि सावरकर असा टोला त्यांनी लगावला.