पाटणला महायुतीच्या उमेदवारांचा रोड शो
पाटण – देशाच्या इतिहासात पहिलीच वेळ आहे की पहिल्या पावणे तीन महिन्यात राजीनामा मी दिलेला आहे. निवडणुकांना मी घाबरत नाही जे सत्य आहे ते नेहमी जनतेसमोर मांडत असतो. कृष्णा खोरे पाटबंधारे विकास महामंडळ या माध्यमातून लोकांचे कोणतेही प्रकल्प मार्गी लागले नाहीत तर ते रखडत पडले. या महामंडळामध्ये काही काळ मीही होतो. परंतु त्यांचा कारभार बघून मी ते सोडून दिले. लोकांच्या जीवावर निवडून येणाऱ्यांनी लोकांचा फक्त वापर केला, अशी टीका उदयनराजे भोसले यांनी केली.
पाटण येथे महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले व शंभूराज देसाई यांच्या प्रचारार्थ रोड शो चे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते.
उदयनराजे भोसले म्हणाले, शेतकऱ्यांसाठी असलेल्या अनेक योजना तळागाळापर्यंत पोहचत नाहीत. त्या पोहचल्या पाहिजेत. वेळ ही फक्त महत्वाची असते ती जर एकदा गेली तर ती परत येत नसते.
40 ते 45 वर्ष अशीच वेळ निघून गेलेली आहे. या पाच वर्षाच्या कालावधी मध्ये भाजप सरकारकडून नियोजनबध्द कार्यक्रम आखला गेला. लोकांनी विश्वासाने निवडून दिलल होतं. अजून ही वेळ गेलेली नाही, तुम्ही त्याच विश्वासाने पुन्हा एकदा आम्हाला निवडून द्या. असे सांगून ते पुढे म्हणाले, उदयनराजेंना बोलता येत का, उभं राहता येत का. असे म्हणणाऱ्यांनी एवढेच लक्षात ठेवावे की, मी जेव्हा उभ राहतो, तेव्हा भलेभले नतमस्तक होतात.
आ. शंभूराजे देसाई म्हणाले, पाटणला नगरपंचायत झाली आणि नगरविकास खात्याकडून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करुन दिला आहे. पाण्याच्या योजनेसाठी जिल्हा विकास खात्याकडून निधी दिला होता. परंतु ते काम का झाले नाही. आमच्या पत्राला शिवायच सुद्धा नाही मग याला कारण काय? स्वतः नाही करायचे व दुसऱ्यालाही करु द्यायचे नाही. 32 वर्षात पहिल्यादाच पाटणकरांच्या दारात आमची सभा होतेय. म्हणजे चित्र बदलत चालल आहे. पाटणकरांच्या वाड्यामध्ये आमची सभा होण म्हणजे बदल होत आहे, असेही देसाई यावेळी म्हणाले.
विक्रमबाबा पाटणकर म्हणाले, अनेकांना आज प्रश्न पडला असेल कि हे समिकरण कसे काय? परंतू माणसाला धर्म, जात, पात असे काही नाही. जिथे छत्रपती तिथे विक्रमबाबा हे समिकरण फिक्स आहे. 22 गावे जी व्याघ्र प्रकल्पांमध्ये गेली. ती श्रीनिवास पाटील व त्यांच्या पीए कडून गेले होते. शंभूराजेंची साहित्य चळवळीला ही नेहमी हजेरी असते. राजकारण व समाजकारण हे कसे वेगवेगळे असते. हे शंभूराजेंनी साहित्य संमेलनाच्या माध्यमातून दाखवून दिले.
नरेंद्र पाटील म्हणाले, राज्यामध्ये मोठ-मोठ्या नेत्यांची आवक होत होती. आ. देसाई यांनी विकासकामे करताना गटतट पक्षपातीपणा केला नाही. उदयनराजे जर पुन्हा एकदा खासदार झाले तर सातारा जिल्ह्याचा विकास भरभरुन होईल. यावेळी पाटणसह परिसरातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार नानासो पवार यांनी मानले.