नवी दिल्ली – भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन वनडे मालिकेतील तिसरा सामना ऑस्ट्रेलियाने 21 धावांनी जिंकला आहे. यासह कांगारू संघाने मालिकाही 2-1 अशी जिंकली. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने भारतासमोर 270 धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात टीम इंडिया 248 धावांवर गडगडली आणि सामना गमावला.
दरम्यान, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील महत्वपूर्ण मालिकेत मुंबईकर आणि टी 20 स्पेशालिस्ट सूर्यकुमार यादव याची श्रेयस अय्यर याच्या जागी प्लेइंग इलेव्हनमध्ये निवड करण्यात आली होती. मात्र, सूर्याला या संधीचं सोनं करता आली नाही. सूर्याने माती केली. तिन्ही सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी त्याची पहिल्याच चेंडूवर शिकार केली.
अशा प्रकारे सूर्याने गोल्डन डकची हॅट्ट्रीक करून लाजिरवाणा विक्रम आपल्या नावावर केला. वनडे मालिकेत सलग तीन वेळा पहिल्या चेंडूवर शून्यावर बाद होणारा सूर्या हा पहिला फलंदाज ठरला आहे. त्यामुळे आता सगळीकडून त्याच्यावर टीकेची झोड उठत आहे. मात्र, आता त्याच्या खराब कामगिरीवर काँग्रेस पक्षाचे दिग्गज नेते शशी थरूर यांनी ट्विट करून थेट टीम इंडियावर निशाणा साधला आहे. सध्या त्यांचं हे ट्विट चांगलंच चर्चेत आलं आहे.
शशी थरूर आपल्या ट्विटमध्ये म्हणाले, “बिचारा सूर्यकुमार यादवने सलग तीन गोल्डन डकसह अविश्वसनीय विश्वविक्रम केला आहे, परंतु आता एकदिवसीय क्रिकेटमध्ये 66 च्या सरासरीने फलंदाजी करणारा संजू सॅमसन 6 व्या क्रमांकावर आहे. असे असूनही तो संघात नाही, त्याला आणखी काय हवे?
Now that poor @surya_14kumar has set an unenviable world record w/ his three golden ducks in a row, is it unreasonable to ask why @IamSanjuSamson, averaging averaging 66 in ODIs despite batting at an unfamiliar position for him at 6, wasn’t in the squad? What does he need to do?
— Shashi Tharoor (@ShashiTharoor) March 23, 2023
यंदाची IPL 2023 ही 31 मार्चपासून सुरू होत आहे. या वर्षीही संजू सॅमसन पुन्हा एकदा राजस्थान रॉयल्सचे नेतृत्व करताना दिसणार आहे. संजू सॅमसनसाठी हा सीझन फलंदाज म्हणून खूप महत्त्वाचा असणार आहे. कारण टीम इंडियाच्या मधल्या फळीत छाप पाडण्यासाठी संजूला आयपीएलच्या 16व्या हंगामात चांगली कामगिरी करावी लागणार आहे’. या आशयाचे ट्विट त्यांनी केलं आहे.