मुंबई : महाराष्ट्राच्या नवे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. ते राज्याचे २१ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. ५ डिसेंबर रोजी हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. फडणवीस तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील.
यावेळी भाजप ज्यासाठी ओळखले जाते त्या धक्कातंत्राचा वापर करत महाराष्ट्रात यंदा मराठा किंवा ओबीसी चेहऱ्याला संधी देऊ शकते असा अंदाज वर्तवला जात होता. मात्र या सगळ्यांमध्ये देवेंद्र फडणवीसांनी बाजी मारली. मुख्यमंत्रीपदी भाजपने पुन्हा देवेंद्र फडणवीसांची नियुक्ती का केली? हे काही मुद्द्यांच्या आधारे जाणून घेऊया…
१) महाराष्ट्रात फडणवीस हे अनुभवी नेते आहे. सहा वेळा आमदार राहीलेले आहेत. त्यांना संघटनापासून ते सरकारपर्यंत सर्व कामांचा अनुभव आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात भाजपाला नव्या चेहऱ्याला संधी देणे अवघड बनले असते. त्यामुळे त्यांनी फडणवीसांना संधी दिली.
२) फडणवीस २०२४ ते २०१९ पर्यंत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यांना दुसऱ्यांदा ऑक्टोबर २०१९ रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. परंतू ७२ तासात त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर २०२२ पासून आतापर्यंत ते उपमुख्यमंत्री राहीले आहेत. फडणवीस नागपूर दक्षिण-पश्चिम येथून १९९९ पासून आमदार आहेत.तसेच त्यांनी नागपूरचे महापौरपददेखील भूषवले आहे.
३) २०१९ मध्ये भाजपला मोठा विजय मिळूनदेखील त्यांना विरोधी पक्षात बसावे लागले होते. त्यावेळी फडणवीसांनी विरोधी पक्षनेतेपद आक्रमकपणे सांभाळत मविआ सरकारवर जोरदार हल्लाबोल केला होता.
४) कोरोना काळातील उद्धव ठाकरे यांच्या सरकारला कोंडीत पकडण्यात तसेच कोविड साहित्य खरेदी घोटाळा उघड करण्यात देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेत्यांची महत्वाची भूमिका होती.
५) २०२२ मध्ये शिवसेनेत फूट पाडून एकनाथ शिंदे एनडीएत आले तेव्हा फडणवीस यांची भूमिका महत्वाची राहीली. त्यांनी मुख्यमंत्री न रहाता एकनाथ शिंदे यांना पाठींबा देत नमती भूमिका घेतली. राज्यातील सरकार अडीच वर्षे सुरळीत चालवून एका आमदाराला फूटू दिले नाही.
६) भाजपाच्या पक्षश्रेष्टींनी फडणवीस यांना उपमुख्यमंत्री बनवले तेव्हा त्यांनी ते पद स्वीकारण्यास नकार दिला. मात्र यानंतर जे.पी. नड्डा यांनी त्यांना कॉल केल्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारले. यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मागची अडीच वर्षे त्यांनी उत्तम सरकार चालवले.
७) महाराष्ट्र भाजपाने साल २०१९ मध्ये १०५ जागा जिंकल्या होत्या. परंतू २०२२ मध्ये झालेल्या सत्तापालटाने एनडीए सरकार स्थापन झाली तेव्हा भाजपाचे केवळ दहा मंत्री बनले तर ४० आमदार असलेल्या शिवसेनेला दहा मंत्री पदे मिळाली. फडणवीस सरकारमध्ये फडणवीस यांनी दुय्यम भूमिका घेत भाजपाच्या आमदारांना एक ठेवत एकनाथ शिंदे यांचे सरकार व्यवस्थित चालवले.
८) साल २०२३ फडणवीस यांनी अजितदादा गट फोडण्यात महत्वाची भूमिका बजावली आणि अजित गटाच्या ४२ आमदारांना महायुतीत सामील केले. फडणवीस यांनी पॉवर शेअरिंगचा फॉर्म्युला काढत अजितदादांच्या नऊ आमदारांना कॅबिनेटमध्ये स्थान दिले.भाजपा-शिवसेनेच्या कोणाही मंत्र्यावर अन्याय होऊ दिला नाही.भाजपाने अजितदादांसाठी आपले सहा खाती सोडली.तर शिंदे गटानेही देखील पाच खाती सोडली.
९) लोकसभा २०२४ निवडणूकांचा भाजपाला महाराष्ट्रात मोठा फटका बसला. या निवडणुकीतून त्यांनी जनतेचा मूड ओळखला आणि रणनीती बदलली. राज्य सरकारने लाडकी बहिण अशी मध्य प्रदेशातील गेमचेंजर योजना आणली. याचा फायदा निवडणुकीत झाला आणि भाजपचे विक्रमी १३३ आमदार निवडून आले.
१०) विधानसभा २०२४ च्या निवडणूकांत देखील जागा वाटप करताना जातीय समीकरणं, मराठा आंदोलन अशा अनेक अडचणी होत्या. भाजपा,शिवसेना आणि एनसीपीने महाविकास आघाडीच्या आधी जागा वाटप करुन मतदारांत वेगळा संदेश दिला आणि अटीतटीची वाटणारी ही निवडणूक महायुतीने एकतर्फी जिंकली.