पिंपरी – यावर्षीच्या पावसाळ्यात पवना धरण दुसऱ्यांदा 100 टक्के भरले आहे. शहराला दररोज पाणी पुरवठा केला तरी हा पाणीसाठा 30 जून 2020 पर्यंत पुरेल इतका झाला आहे.
जुलै महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत गेल्या वर्षीच्या तुलनेत धरणातील पाणीसाठा जवळपास 40 टक्क्यांनी कमी होता.
महिन्याच्या अखेरीस पुन्हा पावसाने दमदार हजेरी लावल्याने अवघ्या आठ दिवसांत धरणातील पाणीसाठा 4 ऑगस्ट रोजी 100 टक्के झाला. त्यानंतर 21 ऑगस्ट रोजी धरणातील पाणीसाठा पुन्हा 100 टक्के झाला आहे. सध्या पाऊस नसल्याने नदीतील पाणी कमी झाले आहे. यामुळे आजपासून धरणातून पाणी सोडण्यास सुरुवात केली आहे. दररोज 0.25 ते 0.30% पाणी सोडले जाते.