पुणे :- हवाई विद्यापीठ भारतासह जगातील विविध देशांनी पुन्हा एकदा चंद्र मोहिमेची आखणी केली असली तरी चंद्र आता वेगळ्याच कारणाने पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. चंद्रावर योग्य परिस्थिती नसतानाही गंज निर्मितीची प्रक्रिया तेथे झाल्याचे शास्त्रज्ञांना आढळले आहे. हवाई विद्यापीठातील शास्त्रज्ञ आणि त्यांचे सहकारी यांनाही अतिशय महत्त्वाची माहिती उपलब्ध झाली आहे.
गंज निर्मितीची प्रक्रिया होण्यासाठी ऑक्सिजन आणि पाणी त्यांची प्रक्रिया होणे महत्त्वाचे असते. चंद्रावरील वातावरण या प्रक्रियेसाठी योग्य नसतानाही हवाई विद्यापीठातील शास्त्रज्ञांना तेथे गंज झाल्याचे काही आडाके मिळाले आहेत.
पृथ्वीवरील वातावरणामध्ये जेव्हा लोखंडावर गंज चढतो तेव्हा तेथे ऑक्सिजन आणि पाणी यांची प्रक्रिया होते. पण, चंद्रावरील जे वायुमंडल आहे. या वायूमंडलातील परिस्थिती भीतीच्या प्रक्रियेसाठी योग्य नाही. सिद्धार्थ तेथे गंज निर्मितीचे पुरावे कसे काढावे याबाबत शास्त्रज्ञ आता संशोधन करत आहेत.
काही शास्त्रज्ञांच्या मते पृथ्वीवरील ऑक्सिजन मुळे चंद्रावरील गोठलेल्या पाण्यामुळे ही प्रक्रिया होऊ शकते. काही शास्त्रज्ञांच्या मते चंद्रावरील गोठलेले पाणी आणि अंतराळातील धूलिकण यांची प्रक्रिया होऊन ही गंज निर्मिती झाली असावी, शकते, झाली असू शकते. चंद्रावर जी थेट सूर्य करणे येतात त्यामधून हायड्रोजनचा अधिक प्रभाव असल्याने येथे ऑक्सिडेशन ची प्रक्रिया सुलभपणे होऊ शकत नाही तरीही तेथे असे पुरावे आढळल्याने शास्त्रज्ञांनी नव्याने संशोधन सुरू केले आहे.