नवी दिल्ली: प्रदुषणाची पातळी अतिचिंताजनक पातळीवर पोहोचल्याने दिल्ली सरकारने शाळांना पाच नोव्हेंबरपर्यंत शाळांना सुटी जाहीर केली आहे. राज्यात सार्वजनिक आरोग्य आणीबाणी जाहीर केली आहे. राज्यभर सर्वत्र धूर आणि धुळीचे साम्राज्य पसरले आहे.
शेतजमिनी पेटवल्याने दिल्लीतील प्रदुषणात कमालीची वाढ झाली आहे. त्यामुळे सरकारने पाच नोव्हेंबरपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे, असे ट्विट मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केले आहे. सकाळी आठ वाजता हवा दर्जा निर्देशांक (एक्यूआय) 459 वर पोहोचला होता. या मोसमात हवा प्रदुषण हवेची पातळी प्रथमच आणीबाणीच्या पातळीवर पोहोचली आहे. अशी स्थिती यापुर्वी 2019 मध्ये निर्माण झाली होती.
सर्वोच्च न्यायलयाच्या आदेशानुसार स्थापन केलेल्या पर्यावरण प्रदुषण प्राधिकरणाने सार्वजनिक आरोग्य आणीबाणी जाहीर केली आहे. दिल्लीतील हवेची स्थिती घातक असून शरिरावर विशेषत: लहान मुलांच्या विपरित परिणाम करणारी आहे. हवाई दर्जा निर्देशांकाची (एक्यूआय) प्रदुषण पातळी सकाळी आठ वाजता 459वर पोहोचली होती. त्यामुळे या सत्रात प्रथमच आणीबाणी जाहीर करावी लागली. यापुर्वी अशी स्थिती जानेवारी 2019 मध्ये निर्माण झाली होती.
दिल्लीतील प्रदुषणामुळे तेथील बांधकाम व्यवसायावर पाच नोव्हेंबर बंदी घालण्यात आली आहे. धूळ आणि धूरळ्याची पातळी अतीगहन झाल्याने ही उपाय योजना केली आहे.याशिावय सम विषम वाहतूक आणि ट्रकवर चार नोव्हेंबरपर्यंत बंदी हे उपाय जाहीर करण्यात आले आहे. दिल्लीत दिवाळीत फटाक्यांचे प्रमण कमी झाल्याने प्रदुषणाची पातळी फार वाढली नव्हती मात्र जमीन पेटवण्याच्या प्रकाराने त्यात वेगाने वाढ झाली. जमीन पेटवून देण्याच्या 220 घटना उपग्रहांनी टिपल्या आहेत. त्या प्रामुख्याने पंजाब आणि हरीयाणातील आहेत.