पुणे – करोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने विद्यार्थ्यांच्या फीबाबत बजावलेल्या आदेशाची शाळांकडून अंमलबजावणीच होत नसल्याचे उघड झाली आहे. त्यामुळे संबंधित शाळांवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
शासनाच्या आदेशाचे शाळांकडून पालन होत नसल्याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य शैलेश विटकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांना निवेदन पाठविले आहे.
शासनाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या शाळांवर कारवाई करावी व विद्यार्थी, पालक यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे. यावर शासनाने तातडीने मार्ग काढण्याची मागणीही करण्यात आली आहे.