पुणे – महापालिकेकडून दहावी- बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तीला अद्यापही महापालिकेस मुर्हूत सापडलेला नाही. त्यातच शिक्षक आणि पदवीधर निवडणूक आचारसंहिता जाहीर झाल्याने ही शिष्यवृत्ती आणखी लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
महापालिका समाज विकास विभागाकडून लोकशाहीर अण्णा भाऊ साठे शिष्यवृत्ती योजना आणि भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद शैक्षणिक अर्थसहाय्य योजनेअंतर्गत दहावी उत्तीर्णांसाठी 15 हजार, तर बारावी उत्तीर्णांसाठी 25 हजार रुपयांचे शैक्षणिक अर्थसहाय्य देण्यात येते. दरवर्षी दहावी- बारावीचे निकाल लागल्यानंतर तसेच पुढील वर्षांचे शैक्षणिक वर्षाचे प्रवेश होताच या शिष्यवृतीसाठी सप्टेंबरमध्ये महापालिका अर्ज मागविते.
मात्र, यंदा करोनामुळे परीक्षांचे निकाल उशिरा लागले, तर प्रवेशही उशिरा झाले. त्यामुळे लॉकडाउन तसेच प्रवेशाचे कारण पुढे करत महापालिकेने दिवाळीपूर्वी या शिष्यवृत्तीचे अर्ज मागवण्याची तयारी केली होती. मात्र, आता आचारसंहिता असल्याने महापालिकेस हे अर्ज मागविण्यासाठी डिसेंबरपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. त्यानंतर ऑनलाइन अर्ज मागवून 31 मार्चअखेर सर्व विद्यार्थ्यांच्या खात्यावर पैसेही जमा करावे लागणार आहेत.
तर अर्ज करण्यासाठीची मुदतही आता पालिके जानेवारी अथवा फेब्रुवारीपर्यंत द्यावी लागणार आहे.