मुंबई,दि. 26 – भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी अटकेत असलेले गौतम नवलखा यांचा जामीन अर्ज उच्च न्यायलयाने फेटळला. त्यावर नवलखा यांनी केलेल्या अपीलावर सर्वोच्च न्यायलयाने आपला निकाल राखून ठेवला आहे.
एनअयएच्या विशेष न्यायलयाने जामीन फेटाळण्याचा निर्णय दिला होता. त्यात कोणताही हस्तक्षेप करण्याची गरज वाटत नसल्याचे सांगत उच्च न्यायलयाने नवलखा यांचा जामीन अर्ज फेटाळला होता. एनआयए न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज 12 जुलै रोजी फेटाळला होता. त्यानंतर 19 फेब्रुवारीला सर्वोच्च न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला होता.
न्या. यु. यु. ललित, इंदिरा बॅनर्जी आणि के. एम. जोसेफ यांच्या खंडपीठाने राष्ट्रीय तपास यंत्रणेला नोटीस बजावली होती. 69 वर्षीय नवलखा हे तळोजा कारागृहात आहेत. एनआयएने 90 दिवसांत आरोपपत्र दाखल न केल्याने जामीन मंजूर करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
नवलखा यांना 29 ऑगस्ट ते एक ऑक्टोबरपर्यंत नजर कैदेत ठेवणे बेकायदा असल्याचे दिल्ली उच्च न्यायलयाने म्हटले आहे. त्यामुळे हा कालावधी अटकेच्या कालावधीत धरता येणार नाही, असे एनआयएचे म्हणणे आहे.