नवी दिल्ली : चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत एसबीआय लाइफ इन्शुरन्सने 389.44 कोटी रुपयांचा नफा कमावला आहे. मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत नफ्यात 47.4 टक्के वाढ झाली आहे. कंपनीने शेअर बाजाराला अशी माहिती दिली. मागील वर्षाच्या याच तिमाहीत कंपनीला 264.२8 कोटी रुपयांचा नफा झाला होता.
या तिमाहीत कंपनीच्या मॅनेजमेंट (एयूएम) अंतर्गत असलेली मालमत्ता 31 डिसेंबर 2018 अखेर एक लाख चौतीस हजार ,150 कोटी रुपयांवरून वाढून एका लाख चौषष्ट हजार 190 कोटी रुपये झाली आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया आणि बीएनपी, परिबा, कार्डिफ, एसए, एसबीआय लाइफ इन्शुरन्स यांचा संयुक्त उद्यम आहे. याची स्थापना 2001 साली करण्यात आली.