नवी दिल्ली : देशाचा अन्नदाता मागच्या अनेक दिवसांपासून कडाक्याच्या थंडीत सरकारने केलेले कृषी कायदे मागे घेण्याच्या मागणीसाठी आंदोलन करत आहे. शेतकरी कायदे मागे घेण्याच्या मागणीवर ठाम आहे. तर शेतकरी आणि सरकार यांच्यातील चर्चानंतर कोणताही तोडगा निघालेला नाही. मात्र असे असले तरी केंद्र सरकारने पुन्हा एकदा शेतकऱ्यांना चर्चेसाठी आमंत्रण पाठवले आहे. याच शेतकरी आंदोलनाच्या मुद्द्यावरून कॉंग्रेसचे नेते नवज्योत सिंह सिद्धू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला लगावला आहे.
राजा इतना भी फकीर मत चुनो की कोई भी व्यापारी उसे अपनी जेब में रख लेI
Punjabi Translation :
ਰਾਜਾ ਐਨਾ ਵੀ ਫ਼ਕੀਰ ਨਾ ਚੁਣੋ ਕਿ ਕੋਈ ਵੀ ਵਪਾਰੀ ਉਸਨੂੰ ਆਪਣੀ ਜੇਬ 'ਚ ਪਾਈ ਫਿਰੇ।— Navjot Singh Sidhu (@sherryontopp) December 23, 2020
देशात सध्या चर्चेचा मुद्दा बनलेल्या शेतकरी आंदोलनासंदर्भात नवज्योत सिंह सिद्धू यांनी ट्विट केले आहे. या ट्विटमधून सिद्धूने पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. राजा इतना भी फकीर मत चुनो की कोई भी व्यापारी उसे अपनी जेब में रख ले, असे म्हणत सिद्धू यांनी मोदींना टोला लगावला आहे. नवज्योत सिंह सिद्धू यांनी हे वाक्य दुसऱ्यांदा ट्विट केले आहे. यापूर्वी मध्येही त्यांनी हे वाक्य ट्विट करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती.
दरम्यान, केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र तोमर यांनी पुन्हा शेतकरी संघटनांना चर्चेचे आवाहन केले. मात्र, दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकरी संघटनांनी केंद्राला प्रतिसाद दिलेला नाही. केंद्राशी बोलणी करून काही निष्पन्न होत नसल्याचे या नेत्यांचे म्हणणे असून आंदोलन तीव्र करण्याचा इशारा त्यांनी दिला. केंद्राच्या निमंत्रणावर बुधवारी निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.