मंदिरबंदीवरून मनसे पुन्हा एकदा आक्रमक
मुंबई : कोरोनची रुग्णसंख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. याच पाश्वृभूमीवर सरकारकडून जनजीवन हळूहळू पुर्वपदावर आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी सरकारकडून सर्वच गोष्टी सुरू करण्यात येत आहेत. त्यात आता मंदिरांच्या मुद्द्यावरुन मनसे पुन्हा एकदा आक्रमक झाली आहे. मनसेने मंदिरं कधी उघडणार यावरुन ठाकरे सरकारला पुन्हा एकदा प्रश्न विचारला आहे. पुनश्च हरि ओम असं म्हणता आणि हरिलाच कोंडून ठेवता? पुनश्च हरि ओम असं म्हणता आणि हरिलाच कोंडून ठेवता? मनसेचे नेते आणि माजी आमदार बाळा नांदगावकर यांनी ठाकरे सरकारला हा प्रश्न विचारला आहे.
पुनःश्च हरी ॐ म्हणता व "हरी" ला च कोंडून ठेवता. बार उघडले, मग बार ची वेळ देखील वाढवून दिली. आता जलतरण तलाव , मल्टिप्लेक्स ला परवानगी, मग कोरोना फक्त मंदिरातच होईल का? काय तर्क (Logic) असावा या मागे हे कोडेच आहे.
हा केवळ भावनेचा नाही तर— Bala Nandgaonkar (@BalaNandgaonkar) November 6, 2020
बाळा नांदगावकर यांनी ट्विट करुन ठाकरे सरकारवर टीका केली आहे. राज्यात बार उघडले गेले, बारची वेळही ठरवून देण्यात आली. त्यानंतर जलतरण तलाव आणि मल्टिप्लेक्स यांनाही संमती देण्यात आली. करोना फक्त मंदिरातच होतो का? हा फक्त भावनेचा प्रश्न नाही तर मंदिरांवर अवलंबून असलेल्या व्यावसायिकांच्या रोजी-रोटीचाही प्रश्न आहे असंही बाळा नांदगावकर यांनी म्हटलं आहे.
तेथील संबधित हजारो व्यावसायिकांच्या उपजीविकेचा व रोजगाराचा देखील प्रश्न आहे.@CMOMaharashtra ,@mnsadhikrut ,@abpmajhatv ,@News18lokmat ,@zee24taasnews ,@TV9Marathi
— Bala Nandgaonkar (@BalaNandgaonkar) November 6, 2020
मनसे बाळा नांदगावकर यांनी ट्विट करुन ठाकरे सरकारवर मंदिरं उघडण्याच्या मुद्द्यावरुन टीका केली आहे. बारची वेळ ठरवून दिली गेली आहे, जलतरण तलाव खुले केले आहेत. मल्टिप्लेक्सलाही संमती देण्यात आली आहे. मग करोना फक्त मंदिरात असतो का? या मागे या सरकारचा काय तर्क असावा हे एक कोडंच आहे असंही बाळा नांदगावकर यांनी म्हटलं आहे.