नगर -हाथरसमध्ये घडलेली घटना ही अत्यंत निंदनीय आहे. देशातील मोदी, उत्तर प्रदेशातील योगी सरकार असंवेदनशील आहे, अशी टीका कॉंग्रेसचे आ. डॉ.सुधीर तांबे यांनी केली. कॉंग्रेस पक्षाच्या वतीने प्रदेशाध्यक्ष महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात यांच्या आदेशावरून नगर शहरातील महात्मा गांधी पुतळ्यासमोर बैठा सत्याग्रह करण्यात आला, यावेळी आ. तांबे बोलत होते.
यावेळी श्रीरामपूरचे आ. लहु कानडे, अहमदनगर शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे, अहमदनगर ग्रामीण जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके, जिल्हा समन्वयक ज्ञानदेव वाफारे, ज्येष्ठ नेते दीप चव्हाण, अल्पसंख्यांक विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष अज्जूभाई शेख, विद्यार्थी शहर जिल्हाध्यक्ष दानिश शेख, पारनेर तालुका अध्यक्ष संभाजीराव रोहोकले, शेवगाव तालुका अध्यक्ष अमोल फडके आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना आ. तांबे म्हणाले, हाथरसमध्ये घडलेली घटना ही अत्यंत अमानवी आहे. क्रूर आहे. या घटनेमध्ये मोदी-योगी सरकार बेजबाबदारपणे वागत आहे. कुठलीही संवेदनशीलता या सरकारची नाही. राहुल गांधी, प्रियंका गांधी यांना दिलेली वागणूक ही देखील निषेधार्हच आहे.
यावेळी आ. लहू कानडे म्हणाले, केंद्रामध्ये मोदी सरकार आल्यापासून देशात दलितांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहेत. हे अत्यंत सूचक आहे. धार्मिक उन्माद घडवून आणत पुन्हा एकदा मध्ययुगातील वर्णव्यवस्था निर्माण करण्याचे षडयंत्र हे सरकार करीत आहे.
यावेळी शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंखे, जिल्हा समन्वयक ज्ञानदेव वाफारे, ज्येष्ठ नेते दीप चव्हाण आदींची भाषणे झाली. शानूभाई शेख, इम्रान बागवान, गुड्डूभाई शेख, चिरंजीवभाऊ गाढवे, नलिनीताई गायकवाड, प्रवीण गीते पाटील, स्वप्नील पाठक, अक्षयभाऊ कुलट, अमित भांड, विशाल कळमकर, प्रमोद अबुज, शंकर आव्हाड यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी सत्याग्रहात सहभागी झाले होते.