नवी दिल्ली : देशात करोनाचा संसर्ग अद्याप थांबलेला नसला, तरी दिलासादायक बाब म्हणजे करोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येत वाढ सुरूच आहे. मागील २४ तासांमध्ये तब्बल ५३ हजार ९२० जणांनी करोनावर मात केली आहे. तर, ५० हजार ३५७ नव्या करोनाबाधितांची नोंद झाली असून, ५७७ रुग्णांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. देशातील एकूण करोनाबाधितांची संख्या आता ८४ लाख ६२ हजार ८१ वर पोहचली आहे.
सणासुदीचे दिवस असल्याने घराबाहेर पडणाऱ्यांची संख्या वाढल्याने, करोनाबाधितांच्या संख्येतही काहीशी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. देशातील एकूण ८४ लाख ६२ हजार ८१ करोनाबाधितांमध्ये ५ लाख १६ हजार ६३२ अॅक्टिव्ह केसेस, डिस्चार्ज मिळालेले ७८ लाख १९ हजार ८८७ जण व आतापर्यंत मृत्यू झालेल्या १ लाख २५ हजार ५६२ जणांच्या संख्येचा समावेश आहे.
With 50,357 new #COVID19 infections, India's total cases surge to 84,62,081. With 577 new deaths, toll mounts to 1,25,562
Total active cases are 5,16,632 after a decrease of 4,141 in last 24 hrs.
Total cured cases are 78,19,887 with 53,920 new discharges in the last 24 hrs pic.twitter.com/nlfKNm6MNZ
— ANI (@ANI) November 7, 2020
देशभरात ६ नोव्हेंबरपर्यंत ११,६५,४२,३०४ नमून्यांची तपासणी करण्यात आली आहे. यातील ११ लाख १३ हजार २०९ नमूने काल तपासण्यात आले आहेत. आयसीएमआरच्या हवाल्याने ही माहिती देण्यात आली आहे.
देशात गेल्या पाच आठवडय़ांपासून दरदिवशी करोनातून बरे होणाऱ्यांचे प्रमाण हे दरदिवशी नव्याने लागण होणाऱ्यांहून अधिक आहे. तर उपचाराधीन रुग्णांच्या संख्येतील घटही कायम असून त्यांचे प्रमाण देशातील एकूण बाधितांच्या संख्येच्या केवळ ६.१९ टक्के इतके आहे, असे शुक्रवारी आरोग्य मंत्रालयाच्या वतीने सांगण्यात आले होते.